॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
अध्याय -८
दत्तावताराचे वर्णन
आत्मसाक्षात्कार कसा घडतो ? ब्रह्मज्ञानासाठी तप करणारे खरे ब्राह्मण
दुसरे दिवशी तिरुमलदास आपले नित्य नैमित्यिक अनुष्ठान झाल्यावर म्हणाले ''अरे शंकरभट्टा आत्मसाक्षात्कार जेव्हा होतो त्यावेळी पंधरा कला आपआपल्या भुता मध्ये लय पावतात त्या त्या देवता मूलभूत शक्ती असलेल्या चैतन्यात लीन होतात. आत्मज्ञान, कर्म इत्यादी ब्रह्म स्वरूपात लय पावत असतात. अशा ब्रह्मज्ञानासाठी जो परिश्रम करीत असतो, तो खऱ्या अर्थाने ब्राह्मण होय. प्राण, विश्वास, आकाश, वायु, अग्नी, जल, भूमी, इंद्रिये, मन, अन्न, बल, विचार, मंत्र, कर्म, लोक, लोकांतील विविध नावे त्यांना अग्नि सोळा कळा असे म्हणतात. श्रीपाद प्रभू षोडश कलांनी परिपूर्ण असे परब्रह्मावतार आहेत.''
अन्न हेच मन होय - सात्विक अन्नाच्या सेवनाने मनाचे निर्मलत्व प्राप्त होते
विधात्याने प्रथम प्राणांची सृष्टी केली. प्राण म्हणजे संपूर्ण विश्वात विद्यमान असलेली प्राण शक्ती होय. त्या प्राण शक्तीस सूक्ष्मात्मा, हिरण्यगर्भ या नावाने सुध्दा संबोधिले जाते. प्राणमय कोषामध्ये स्थित जीवधातु शक्तीला शक्ती शरीर असे म्हणतात. प्राणमय चैतन्यास संतुलितरीत्या प्रवाहित केल्यास मनुष्यांचे भौतिक दु:खांचे निवारण होते. मनुष्याचा स्थूल देह रोगी होण्यापूर्वी प्राणमय शरीर रोगग्रस्त होते. त्याच्या नंतर स्थूल शरीर रोगग्रस्त होते. सृष्टीच्या प्रारभांचा निश्चय झाल्यावर पंचमहाभूतांचा अविर्भाव झाला. या पंचभूतांचे आकलन करण्यासाठी पंचेंद्रियांची रचना झाली. ह्यांचे संधान करून व्यवस्थित काम करण्यासाठी पंचेंद्रियांची योजना झाली. या दहा इंद्रियावर मनाचा ताबा असतो आणि मन हे आहारा पासून बनते म्हणून मनुष्याने आपल्या आहारा विषयी अत्यंत सावध असले पाहिजे. कारण आहाराच्या सूक्ष्म भागानेच (सुक्ष्मांशाने) मनातील भावना प्रकट होतात. जसे आहाराचे गुण त्याप्रमाणे आपले विचार होतात. मनातील विचाराच्या धारेस क्रमबध्द करून नियंत्रित करणे यालाच ''मंत्र'' असे म्हणतात. यज्ञ-यागादिकांचे विधिपूर्वक आचरण करीत त्या त्या कर्मकांडात सांगितलेले मंत्रोच्चारण विधिपूर्वक करणे ह्यास ''कर्म'' असे म्हणतात. विश्वनिर्मितीचा आधार कर्मच आहे. नामरूप विवर्जित जग असू शकत नाही. आपल्यामधील प्रत्येक इंद्रियास एक एक देवता असतात. या देवतेच्या प्रभावाने ती ती इंद्रिये कार्य करीत असतात. समाधिस्त असलेल्या योग्यास जेंव्हा आत्म साक्षात्कार होतो त्यावेळी सोळा कला, मूलतत्वात लय पावतात. योग्याच्या भौतिक इंद्रियातील चैतन्य शक्ती विश्वातील चैतन्य शक्तीमध्ये लीन पावते. कर्मेंद्रिये व ज्ञानेंद्रियाने युक्त असलेला मनुष्य कर्म न करता राहू शकत नाही.
अहंकार नष्ट झाल्याशिवाय मोक्षाची प्राप्ति होत नाही
मनुष्याच्या अहंकारामुळे कर्माचरण घडत असते. अहं म्हणजे मन आणि बुध्दि हे अज्ञानाच्या आवरणांनी आच्छादित झालेले अशुध्द चैतन्यच होय. आत्मसाक्षात्कार झालेल्या योग्यास जन्मांतराचे कर्मफल शेष राहात नाही. अहंकार पूर्णपणे नामशेष झाल्याशिवाय आत्मसाक्षात्कार होत नाही. योग्यास जेंव्हा आत्मसाक्षात्कार होतो तेंव्हा श्रौत कर्म आणि त्याच्या प्रतिफलाचे ज्ञोंच्द्र महद अहंकार असून, मायाजालासहित शाश्वत परमात्म्यामध्ये लीन होऊन व्यक्तित्व रहित होतो. परमात्मा व्यक्तित्व सहित शक्ती स्वरूप होऊन राहिला आहे. कर्म व त्याच्या फलाचा नाश पाऊन योगी सिध्दावस्थेस प्राप्त करतो. जरी योगी कर्म फलाचे भोग स्थूल देहाने भोगत असला तरी देहाभिमान नसल्या कारणाने, तो सतत मुक्तावस्थेत स्थित असतो. परमात्मा योग्यांच्या द्वारे आपल्या दिव्य लीलांचे प्रकटीकरण करीत असतो. योगीक शक्तीचा अहंकार एखाद्या योग्यास झाला असेल तर सर्व शक्तींचे हरण करून त्याचा गर्व हरण करण्याचे सामर्थ्य परमात्म्यात असते. श्री बापन्नार्यानी श्रीशैल्य क्षेत्री असलेल्या श्री मल्लिकार्जुन आणि गोकर्ण क्षेत्री स्थित महाबळेश्वर व इतर कांही ठिकाणी सौर मंडलातून शक्तीपात केला होता. स्वयंभू दत्ताची उत्सव मूर्ती तसेच अर्चन मूर्तीत सुध्दा शक्तीपात केला होता. अग्निसंबंधित असलेल्या या शक्तीस शांती विधान करावे लागते. तसे न केल्यास अर्चकासह अर्चना करविणारे सुध्दा अर्चना मूर्तीच्या प्रखर तेजाने शिक्षेस पात्र होऊन त्यांना अनिष्ट फल प्राप्त होते. स्वयंभू दत्त मूर्ती मध्ये झालेल्या शक्तीपाताचे रहस्य केवळ अंतर ज्ञानी असलेले योगीच जाणू शकतात. श्रीशैल्य मल्लिकार्जुन स्थानी शक्तीपात, हजारो लोक उपस्थित असताना श्री बापन्नार्यांच्या अध्वर्यत्वाने झाला होता. सूर्य मंडळातील तेज बाहेर पडून सर्वांच्या समक्ष मल्लिकार्जुनाच्या लिंगात ते लीन झाले. श्रीपाद श्रीवल्लभ यांचा अवतार व हा शक्तीपात ही दोन अत्यंत गोपनीय अशी दैवी रहस्ये आहेत. ती केवळ महायोग्याना सांगण्यासारखी व त्यांनीच जाणण्या योग्यआहेत. श्रीशैल्यात झालेल्या शक्तीपात शांती विधान करण्यात आले. यात हजारोंच्या संख्येने अन्नदान झाले. त्या योगाने जठराग्नि शांत झाला. उग्रत्वाची शक्ती शिथिल होऊन शांती तत्वात लीन झाल्यामुळे सर्व कार्य शांत व शुभप्रद झाले. पिठापूर येथील स्वयंभू मूर्तीवर झालेल्या शक्तीपातास प्रत्यक्ष साक्ष व दाखला नसल्याकारणाने तेथे शांती विधान किंवा अन्नदान झाले नाही. श्री बापन्नार्यानी अन्नदान करण्यास सुचविले असता, पिठापूरातील ब्राह्मण पंडितांनी तर्क, विर्तक करून श्री बापन्नार्याची सूचना फेटाळून लावली.
श्रीपाद षोडश कला परिपूर्ण
काळ आपल्या गतीने चालला होता. श्रीपादांचे वय आता दोन वर्षाचे झाले. या दोन वर्षाच्या कालावधीत श्रीपादांनी आपण षोडश कलांनी परिपर्णअसल्याचे अनेक बाललीलाद्वारे दाखवून या युगातील महा अवतार असल्याचे निदर्शनास आणले होते. वयाच्या सोळाव्या वर्षी श्रीपाद प्रभूंनी पिठापूर सोडले. त्यानंतर ते चौदा वर्षे पर्यंत कुरवपूर व आणखी कांही क्षेत्रात राहिले. परंतु त्यांची शरीरयष्टी सोळा वर्षाच्या किशोराप्रमाणेच होती.
श्री दत्तात्रेयांचे षोडश अवतार :
सोळा या संख्येस एक वैशिष्ट्य आहे. श्री दत्तात्रेयानी पूर्व युगात सोळा अवतार धारण केले होते. ते असे 1) योगीराज, 2) अत्रिवरद, 3) दिगंबरावधूत, 4) कालाग्निशमन, 5) योगीजन वल्लभ, 6) लीला विश्वंभर, 7) सिध्दराज, 8) ज्ञानसागर, 9) विश्वंभरावधूत, 10) मायामुक्तावधूत, 11) आदिगुरु, 12) संस्कारहीन शिवस्वरूप, 13) देवदेव, 14) दिगंबर, 15) दत्तावधूत, 16) श्यामकमल लोचन.
श्रीदत्त प्रभू भोग व मोक्षाचे दाते होत. त्यांची आराधना करण्यासाठी केवळ त्यांच्या पादुकांची आराधना केली असता पुरे. चारी वेद श्वान रूपाने त्यांच्या पादुका जवळ साऱ्या अपवित्रतेस पवित्र करीत त्यांच्या चरण कमली पडून असतात. श्री दत्तात्रेयांच्या पवित्रतेची कल्पना करण्यास मानव तर काय देवता व सप्तऋषी सुध्दा असमर्थ होत. युगांतरी जेंव्हा वामनावतार झाला तेंव्हा त्याचे समकालीन असलेले श्री वामदेव महर्षीचा सुध्दा जन्म झाला. त्यांच्या जन्म समयी मातेच्या गर्भातून केवळ शिर बाहेर आले व चारी दिशेंचे अवलोकन करून पुन: गर्भात निघून गेले. तेंव्हा देवता व ऋषीगणांनी प्रार्थना केल्यावर श्री वामदेवानी पुन्हा जन्म घेतला. ते जन्मत: शुध्द ब्रह्मज्ञानी होते.
त्याचप्रमाणे श्रीपादांच्या जन्म समयी सुध्दा घडले. ते केवळ ज्योती स्वरूप होते. याप्रमाणे दोन वेळा जन्म घेतल्याने ते आजन्म द्विज होते. ते संपूर्ण, अखंड, अनंत, अद्वैत, सच्चिदानंदघन असल्या कारणाने या अवतारात त्यांना गुरू अशी व्युक्त नव्हती. वास्तवात, ते त्रिमूर्तीचे संयुक्त रूप नसून त्रैमूर्तीच्या अतीत असलेले एक विशिष्ट तत्व होते. म्हणून त्या त्रैमूर्तिस अतीत असलेले चतुर्थतत्व असल्याचे सुचविण्यासाठी त्यांनी चतुर्थीस अवतार घेतला. मातेच्या गर्भातून बाहेर येऊन पुन्हा गर्भस्थ झाले असता, महायोगी, सिध्द पुरुष व देवतांच्या प्रार्थनेस प्रसन्न होऊन पुन्हा जन्मल्यामुळे ते आजन्म ब्रह्मज्ञान संपन्न होते. चित्रा नक्षत्राचा अधिपति अंगारक (मंगळ) आहे. तो ग्रह पाप (नीच) स्थानी असता सकल जीव राशीस अमंगलप्रद ठरतो . सकल अमंगळाचे हरण करून शुभमंगलत्व प्रदान करण्यासाठी प्रभूंनी चित्रा नक्षत्रामध्ये जन्म घेतला. चित्रा नक्षत्र असतांना श्रीपाद प्रभुंचे पूजन केल्यास विशेष फलप्रद ठरते . श्रीपाद प्रभू साक्षात धर्मशास्ते आहेत. ते हरी-हरात्मज श्री अय्यप्पा स्वामी असल्याचे सुचविण्यासाठी त्यांनी तूळ राशीमधे जन्म घेतला. ते जाणत नाहीत असे धर्मशास्त्रच नाही. धर्म संकटात सापडलेल्या मनुष्याने त्यांची प्रार्थना केल्यास त्यास धर्म पथप्रदर्शनाचा लाभ होतो. सूर्य हा ग्रहांचा अधिपति आहे. सिंह लग्नामध्ये जन्म घेतल्यामुळे ते सकल विश्वाचे नाथ व दरबार भरण्यासाठी जन्म घेतलेले जणुकांही चक्रवर्तीच आहेत असे सूचित होते.
श्रीदत्तप्रभूपासून त्रिमूर्ती आणि त्रिमूर्तीपासून तीन कोटी देव व त्यांच्या पासून तेहतीस कोटी देवता उत्पन्न झाल्या. म्हणून केवळ श्रीदत्त नामस्मरणाने सकल देवतास्मरण केल्याचे फल प्राप्त होते.
श्रीदत्तप्रभूंच्या ब्रह्ममुखास ऋषी पूजन करावे. विष्णुमुखास, श्री सत्यनारायण व्रत व विष्णु सहस्त्र नामाने पूजन करावे. त्यांच्या रुद्रमुखास, रुद्राभिषेकाने अभिसिंचन करावे. श्रीदत्तप्रभूंच्या ब्रह्ममुखाच्या जिव्हेवर सरस्वतीचा निवास आहे. विष्णूमुखाच्या वक्षस्थळी लक्ष्मीचा वास आहे. रुद्रमुखाच्या वामभागी गौरीचा वास आहे. सृष्टीतील सकल स्त्री देवता शक्ती श्रीपादाच्या वामभागी व पुरुष देवता शक्ति दक्षिण भागी विराजमान आहेत. तिरुपतीमधील सप्त गिरीवर अवतरलेले श्री वेंकटेश्वर स्वामी हे साक्षात श्री दत्तप्रभूच. ''वें'' कार हे अमृत बीज व ''कट'' हे ऐश्वर्य बीज होय. म्हणून श्री वेंकटेश्वर हे अमृत व ऐश्वर्याचे प्रदाते आहेत. ''वें'' म्हणजे पाप व ''कट'' म्हणजे खंडन करणारा किंवा हरण करणारा असा अर्थ आहे. श्री वेंकटेश्वर आणि श्रीपाद श्रीवल्लभ खरे पाहता एकच असून अभिन्न आहेत. तेंव्हा मी म्हणालो ''हे तिरुमलदास ! पूर्वी वर्णाश्रमधर्म काटेकोरपणे पालन करावा असे विद्वज्जनांचे म्हणणे होते. परंतु श्रीपाद प्रभूंचे मत याच्या विरूध्द होते असे मला वाटते. तर माझ्या या शंकेचे समाधान करावे अशी विनंती.'' यावर तिरुमलदास म्हणाले ''अरे ब्राह्मणांने ब्रह्मज्ञानाच्या अन्वेषणात (प्राप्तीसाठी ) जीवन घालविले. तरच तो सद्ब्राह्मण म्हणवला जातो. विहित धर्म, कर्माचा त्याग करून दुराचारी झाल्यास तो दुष्ट ब्राह्मण होईल. त्याचे दुराचार वाढून तो गो हत्या व गो-मांस भक्षण करण्यास प्रवृत झाल्यास त्याच्यातील ब्राह्मणत्व लोप पाऊन त्याचे ब्राह्मतेज संपूर्णपणे क्षीण होते. त्याच्या शरीरातील जीवन कणांमध्ये बदल घडून तो चांडाळत्वास प्राप्त होतो. तेंव्हा तो ब्राह्मण होऊ शकत नाही. क्षत्रियाने ब्रह्मज्ञानाच्या आकांक्षेने निरंतर तपाचरण केल्यास ब्राह्मणत्व प्राप्त करू शकतो. क्षत्रियांच्या शरीरात जन्मजात असलेल्या जीवनकणात तपाचरणाने बदल घडून, त्याला ब्राह्मणत्व प्राप्त होते. या प्रमाणे विश्वामित्रांना ब्राह्मणत्व प्राप्त झाले होते. शनीग्रहाचे तीन राशीत म्हणजे साडेसात वर्षे पर्यंत चलन असते. तेंव्हा प्रत्येक मनुष्याच्या शरीरातील जीवनकणांमध्ये बदल घडतो. जुन्या जीवन कणांचा नाश होऊन नूतन जीवन कणांचे सृजन होत असते. याची मनुष्यास कल्पना सुध्दा येत नाही.''
क्षत्रियांचे लक्षण
क्षत्रियाने क्षात्रधर्माचा त्याग करून शांतीरस प्रधान असलेले कृषी, गोसेवा, वाणिज्य, अशा धर्माचे पालन करून स्वकर्म सोडल्यास त्याच्यातील क्षात्रतेज टिकून राहत नाही. त्याच्या मन, बुध्दि व शरीरात अनेक बदल घडून येतात आणि तो वैश्यत्वास पावतो. ब्राह्मणाने क्षात्र धर्माचे अवलंबन केले असता परशुरामासारखा होतो. पूर्वी द्रोणाचार्य आणि कृपाचार्य जन्मत: ब्राह्मण असले तरी त्यांनी क्षात्र धर्माचे पालन केले नव्हते का ? कुसुम श्रेष्ठी वैश्य असला तरी त्याने क्षत्रिय वृत्तीचे अवलंबन केले नव्हते का ? जन्मत: शुद्र असून श्रीपाद प्रभूंच्या कृपेने मला ब्रह्मज्ञान प्राप्त झाले नाही का ? निरंतर प्रयत्नाने (तपाचरणाने) शूद्र सुध्दा वैश्य, क्षत्रिय किंवा ब्राह्मण होऊ शकतो. केवळ एका विशिष्ट वर्णात जन्म झाला म्हणजे यम, धर्म, शिक्षा आचरीत आहे किंवा नाही असे नसून, आपआपल्या शुभ कर्माच्या फलावर आपला वर्ण अवलंबून आहे. जन्मत: शूद्र असलेल्या मला पुढचा जन्म ब्राह्मणाचा मिळू शकेल. तसेच जन्मत: ब्राह्मण असलेल्यास पुढचा जन्म शुद्राचा सुध्दा मिळू शकतो. सामाजिक कारणासाठी वर्ण व्यवस्था करण्यात आली. परमात्म्याचे मुख ब्राह्मणत्व, बाहू क्षत्रियत्व, ऊरु वैश्यत्व व पाद शुद्रत्वाचे सूचक आहेत असा श्रीपादांनी एक पर्याय सांगितला. तू माझ्या अतिथ्याचा स्वीकार केलास. माझ्या घरचे भोजन हे ब्राह्मणाच्या घरचेच भोजन होय.
कर्मरहस्य
निरंतर श्रीपादांचे नामस्मरण व ध्यान केल्याने येथील परिसरातील वातावरण शुभप्रद आणि पवित्र अशा स्पंदनाने भरले आहे. जन्मत: नरसावधानी ब्राह्मण असले तरी त्यांच्या घरात भौतिक, मानसिक व अध्यात्मिक स्पंदने विषपूरित असल्याकारणाने तेथील वायुमंडल कलुषित झाले होते. या कारणानेच श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या अतिथ्याचा स्वीकार केला नाही. यातील हे रहस्य आहे बरे का ! जीव परिणाम क्रमाने किंवा विपरिणाम क्रमाने कर्मसुत्राच्या अनुसार जन्म घेण्यास वर्ण आवश्यक आहे. नाही का ? यासाठी वर्णाश्रमाची योजना झाली. जाँन, हा जर्मनी देशाचा रहवासी असून सुध्दा त्याला ब्रह्मज्ञानाची अत्यंत जिज्ञासा लागली होती. परिणाम क्रमाच्या शेवटच्या अवस्थेत त्याला कुरवपुरी श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले व अमोघ अशा अनुग्रहाची प्राप्ति झाली. नरसावधानी पीठिकापुरमध्ये असून सुध्दा श्रीपाद, श्री दत्तात्रेयांचे अवतार आहेत हे जाणण्यास त्यांना कित्येक वर्षे लागली. हे जाणल्यानंतर सुध्दा साधनाक्रमाशिवाय श्री दत्तांच्या अनुग्रहास प्राप्त होणे अशक्य होय.
यावर मी म्हणालो ''स्वामी आपले म्हणणे असे आहे की प्रत्येक जीवकणांमध्ये बदल घडत असतो. तर प्रत्येक जातीस एक आत्मा आहे काय ? पार्वती देवी ही हिमपर्वताची कन्या असे म्हणातात. असे म्हणण्याचे कारण काय ?''
यावर तिरुमलदास म्हणाले ''प्रत्येक जातीस एक आत्मा असतो. तो शक्तीच्यारूपात असतो. ती शक्ती , दिव्यात्मा असल्या श्रीदत्तप्रभूंच्या मधून बाहेर आलेली आहे. सदैव या शक्तीचा संबंध परमात्म्याशी असल्या कारणाने, ती महाशक्ति होय. जात या शब्दाचा अर्थ तू जो समजतोस तसा नाही. जिवंत व्यक्तिमध्ये जसे चैतन्यवंत असे जीवकण असतात, असा आहे. त्याचप्रमाणे सामुहिक/सांघिक व्यक्तित्वामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे शक्ति -सामर्थ्य गुणगण अंतर्लीन होऊन असतात. तसेच प्रत्येक गावास, प्रत्येक शहरास, प्रत्येक राष्ट्रास एक आत्मा असतो. आपण राहतो त्या भूमीस सुध्दा आत्मा आहे. भूमीची जी अधिष्ठान देवता तीस आपण भूमाता'' असे म्हणतो. तीच्यातील आत्म्याचे, परमात्म्याचे अंश असल्या कारणाने ती मानसिक संबंध असलेली महाशक्ती आहे. तसेच हिमपर्वताच्या ठायी अधिष्ठित असलेल्या देवताशक्तीस हिमवंत असे संबोधित करतो. त्या हिमवंताची पुत्री हेमवती होय. सर्वसाक्षी सूर्य भगवानांचे पुत्र यमधर्म असे मानल्यास, जीवराशीच्या शुभाशुभ कर्मानुसार न्याय करून पाप्यांना शिक्षा करणारी देवता शक्ति आहे असा अर्थ होतो.
जगातील सारे प्राणीमात्र, आपआपले कार्य करण्यासाठी सूर्यापासून उर्जा प्राप्त करतात. आकाशात विराजमान असलेले सूर्य बिंब वेगळे व त्याच्यात अधिष्ठित असलेले देवता स्वरूप देवतात्मा वेगळे. श्रीपाद वल्लभ वयाच्या तिसाव्या वर्षी गुप्त होतील असे मी तुला सांगितले होते. ते अनंत कोटी ब्रह्मांडात असलेल्या अणु-रेणु मध्ये विलीन होतील. ते सर्वांतर्यामी आहेत ना ? पुन्हा विलीन होणे म्हणजे काय ? असा प्रश्न तू विचारू शकतोस. ते सर्वांतर्यामी असले तरी त्यांच्या शक्तीच्या प्रभावापासून थोडया अंतरावर कोटयावधि ब्रह्मांडे आहेत. त्या ब्रह्मांडातील परिभ्रमणांचे व्यवस्थीकरण करण्याच्या उद्देशाने त्यांच्या शक्ति प्रभावाने त्या ब्रह्मांडास आपल्या जवळ आकर्षित करतात. संपूर्ण सृष्टीत परिणाम दशेत एखादी विपत्कारी स्थिती उत्पन्न झाली असता श्री दत्तात्रेयांचा अवतार होते. चुंबक लोहाचे आकर्षण करते. परंतु लोहावर मालिन्य असल्यास चुंबकाची आकर्षण करण्याची शक्ति अत्यंत बलहीन होते. मलिनत्वास नाहीसे करून, सृष्टीतील प्रत्येक अणुचे आकर्षण करून, विश्वपरिणामास नूतन दिशा देण्याचा संकल्प जेंव्हा होतो त्यावेळेस मात्र असे अवतार होतात.
पंच कन्यांचे विवरण
तेंव्हा मी म्हणालो ''स्वामी ! अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरस्तथा । पंचकन्याम् पठेन्नित्यम् महापातक नाशनम् ॥''-असे म्हणतात. हा विषय मला सुलभ रीतिने समजत नाही म्हणून ह्याचे विवरण करावे ही प्रार्थना.
तिरुमलदास यावर म्हणाले - ''अहल्येवर इंद्र मोहित झाला होता व तिला प्राप्त करण्यासाठी त्याने मायेचा उपयोग केला, कुक्कुट रूप धारण करून त्याने बांग दिली. पहाट झाली असे समजून गौतम ऋषी अनुष्ठानास बाहेर गेले. पतिव्रता असल्या कारणाने इंद्र अहल्येस स्पर्श करू शकत नव्हता. इंद्र देवता देवशक्तिसंपन्न असल्या कारणाने, त्याने अहल्ये मायेची अहल्या उत्पन्न करून त्या मायेच्या अहल्येशी समागम केला. माया अहल्येच्या शरीरातील जीवाणू इंद्राच्या तीव्र अशा इच्छामुळे उत्पन्न झाली होती. माया अहल्या व इंद्र समागमी असता गौतमाने पाहिले व क्रोधित होवून त्या दोघांस शाप दिला. अहल्या म्हणाली ''हे मुनीवर, आपण हे काय केले ?'' अध्यात्मात अहल्या गौतमापेक्षा उच्च स्तरावर होती. अहल्येच्या शापामुळे गौतम ऋषी 12 वर्षंपर्यंत भ्रमिष्ठ होऊन तदनंतर शिवार्चना करून स्वस्थ झाले. अहल्येची मनशक्ती जड झाल्याने तिचे शरीर पण जडत्व पावून शीळा झाली. श्रीरामाच्या चरण धुळीने अहल्येचे शाप विमोचन झाले. म्हणून अहल्या परम पवित्र आहे असे जाण.'' शापग्रस्त झालेला इंद्र पंच पांडव म्हणून जन्मास आला. पाच रूप, पाच मन असले तरी, त्यांस आधारभूत असलेला आत्मा एकच ! हा एक विचित्र असा विषय आहे. शचीदेवीचा आविर्भाव यज्ञकुंडात द्रौपदीच्या रूपाने झाला. ती अयोनिजा आहे.
खऱ्या सीतेस अग्नीदेवाने आपल्या गर्भात लपविले व मायेच्या सीतेस रावणाने लंकेस नेले. अग्निप्रवेश केल्यावर मायेची सीता गुप्त झाली व खरी सीता बाहेर आली. म्हणून सीता महापतिव्रता आहे असे जाण.
भूचक्रात 12 राशीमध्ये 27 नक्षत्रे आहेत. या 27 नक्षत्रांची जी अधिष्ठात्र देवता आहे तिचा जन्म तारादेवी म्हणून झाला. ती भर यौवनात असताना, गुरु ग्रहाचे अधिष्ठात्र देवता असलेले बृहस्पती , मोहित झाले व तिच्याशी विवाह केला. वृध्द पति यौवनवतीस तृप्त करू शकत नाही. हा विषय धर्म विरुध्द आहे. म्हणून विवाहसमयी केलेले शपथेचे उल्लंघन झाल्यास क्षती नाही. तारादेवीच्या मनात बृहस्पती विषयी कधीच पती असल्याचे भाव उत्पन्न झाले नाहीत. तारादेवीच्या मनात पतीचे भाव उत्पन्न करण्याची जबाबदारी बृहस्पतींची होती. तसे न करता सकल धर्मांचे ज्ञाते असलेले बृहस्पतीने, धर्म विरुध्द आचरण केले. तारादेवीच्या शरीरातील जीवाणूंचे तिच्या मन:प्रवृती प्रमाणे बदल घडले. तिच्या मनात चंद्राचे रूप स्थिर झाले असून तिचे हृदय चंद्राधीन झाले होते. ह्या प्रमाणे बदल घडलेली तारादेवी व पूर्वी बृहस्पतीस विवाह केलेली तारादेवी भिन्न होत. म्हणून तारा-चंद्र यांचे मिलन हे धर्म विरूध्द नाही. सृष्टी नियमाप्रमाणे 27 नक्षत्रांतून भ्रमण करणे हा चंद्राचा धर्म होय, गुरु ग्रहाचा नव्हे. जर गुरुग्रहाने असे केल्यास, धर्म विरूध्द होईल. कुठल्याही धर्म विरूध्द कार्याची अधोगती होते. म्हणून 27 नक्षत्रांची अधिष्ठान देवता तारादेवी, चन्द्र मंडलाचे अधिष्ठान देवता असलेल्या चंद्रास पावणे हाच धर्म होय. बाबारे ! ह्या धर्मसूक्ष्मास अनुसरून तारादेवी महापतिव्रता होय.
भीष्माचार्य शरशय्येवर असता, युधिष्ठिरांस हितोपदेश केला. भीष्म म्हणाले ''कुकर्म घडत असता, शक्यतो त्याचा विरोध केला पाहिजे किंवा अधर्म घडत असलेल्या त्या स्थलाचा त्याग केला पाहिजे.'' यावर द्रौपदी खुदकन् हासली. त्यावर भीष्म म्हणाले, ''ज्या वेळी द्रौपदीचा मानभंग झाला, तेंव्हा माझे वागणे अनुचित होते. कारण त्यावेळी मी दुर्योधनाच्या आश्रयात होतो. त्याच्या अन्न सेवनाने, माझे रक्त कलुषित झाले होते व बुध्दी भ्रष्ट झाली होती. आता ते कलुषित रक्त माझ्यात नसून, बुध्दी कल्मषरहित झाली असून, ज्ञानोदय झाला आहे.''
जीव परिणाम दशेत अनेक जन्म घेत असतो. थोडया जन्मात स्त्री तर थोडया जन्मात पुरुष होतो. मानव जन्माव्यतिरिक्त , पशू-पक्ष्यादिंचा सुध्दा जन्म घेतो. जन्मांतरी, मंदोदरीचा पुरुष जन्म होता, त्या जन्मामध्ये तिला एक चंचल स्वभावाची, एक दुष्ट स्वभावाची व एक मृदु स्वभावाची, अशा तीन पत्नी होत्या. इहजन्मी, चंचल स्वभावाची पत्नी वानर होऊन वाली झाला, दुष्ट स्वभावाची पत्नी राक्षस होऊन रावण झाला व मृदु स्वभावाच्या पत्नीचा बिभीषण म्हणून जन्म झाला. कल्पांतरी, हे तिघे मंदोदरीचे पुरुषजन्म असता तिचे पत्नी होते. तर ती या जन्मी, चंचल वृत्ती असलेला वाली ह्याची पत्नी झाली व त्या पासून अंगदाचा जन्म झाला. तदनंतर, दुष्ट प्रवृत्ती असलेल्या रावणाचीभार्या झाली. रावण संहारानंतर, मृदुस्वभाव असलेल्या विभीषणाची पटराणी झाली. तर वालीची पत्नी असताना, रावणाची पत्नी असताना व बिभीषणाची पत्नी असताना तिच्यातले जीवाणू भिन्न होते. म्हणून मंदोदरी सुध्दा महापतिव्रता होय !
तेंव्हा मी म्हणालो - ''स्वामी ! स्त्रीस एकच पती किंवा पुरुष एकपत्निव्रत असला पाहिजे असे म्हणतात तर बहुभार्या किंवा बहुभर्तृत्व निंदनीय आहे ना ?''
कर्मचक्र परिणाम :
तिरुमलदास म्हणाले - ''तुझे म्हणणे खरे आहे. एखाद्या पुरुषाने विनाकारण पत्नीस त्रास दिला तर सप्तजन्मपर्यंत बाल विधुर होतो असे सांगीतले आहे. एखादा पुरुष चार-पाच स्त्रियांशी विवाह केल्याने, पुढील जन्मी, हा पुरुष स्त्री जन्म घेतो व त्या चार-पाच स्त्रिया, त्यांची कामवासना व संस्कार क्षीण न झाल्याने, पुरुष जन्म घेऊन त्या स्त्रीचा उपभोग घेतात. एकाजन्मी असे झाल्यास व्यभिचार दोष घडतो. जर विविध जन्म घेऊन प्रत्येक जन्मी, एकाशी विवाह केल्याने दोष नाही. हा कालचक्राचा प्रभाव आहे. असल्या कित्येक आश्चर्यकारक घटना या महाचक्रात घडत असतात. स्त्री जन्म घेतल्यास त्या जन्मासंबंधित धर्माचे आचरण केले पाहिजे. पुरुष जन्म घेतल्यास त्या जन्मा संबंधित धर्माचे आचरण केले पाहिजे.''
पती-पत्नीमध्ये कलह उत्पन्न करणाऱ्या व्यक्तीचा पुढचा जन्म स्त्री अथवा पुरुष न होता, नपुंसक होतात व संसारसुखास वंचित होऊन दु:खी होतात. मांसाहार निषिध्द आहे. समजा एखादी व्यक्ति एका शेळीचा वध करून चार-चौघाबरोबर मांसाहार करते. त्या शेळीस प्राणोत्क्रमण समयी अत्यंत पीडा होते तिचे पीडित स्पंदन वायुमंडलात वावरत असतात. बाबारे ! वायुमंडलात पीडामय व आनंदमय स्पंदने असतात. सत्कर्मांमुळे आनंदमय स्पंदने व दुष्कर्मांमुळे पीडामय स्पंदने उत्पन्न होतात. मृत शेळीने मारून खाल्लेल्या चार-चौघा मानवांचा सूड घ्यावा अशा इच्छेने प्राण त्याग झालेल्या कारणाने, मानव जन्म घेते व मांसभक्षण केलेल्या मानवांचा, शेळींचा जन्म होतो. म्हणून, मानवांनी क्षमागुणाचे अवलंबन केले पाहिजे. सात्विक व्यक्ति शेळीस पाहिल्यावरही त्याचे मांस भक्षण करू इच्छित नाही. जरी ती शेळी पुर्वजन्मी मारलेल्या मनुष्यास क्षमा करील तर त्या शेळीस प्राणदान केल्याचे पुण्य लाभून तिचे कर्मचक्र थांबते.
पीठिकापुरीच्या रहिवाश्यांचे सामुहिक पुण्य व सामुहिक पाप एकाच वेळेस फलित झाल्याने, श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मास कारणीभूत झाले. पुण्यवान लोकांनी श्रीपादांस श्री दत्तप्रभू असल्याचे जाणले व अधिक पुण्यफल प्राप्त करते झाले तर पापी जन श्रीपाद श्रीदत्त असल्याचे नाकारून अधिक पापाचे भागिदार होते झाले. श्री दत्ताची आराधना करीत असून श्रीपादांची निंदा करणाऱ्यांस रौरवादि नरकाची प्राप्ति होते. विषय न समजल्यास मौन धारण करणे उचित होय. पण त्या दिव्य भव्य अशा मंगल स्वरूपावर निंदापवाद लादणे योग्य नव्हे. त्यांच्या मुखांस मंगलारती करीत पायांवर खिळे ठेकणारे असे लोक सुखव्याधींनी ग्रस्त होतील. एवढेच नव्हे, श्री दत्तात्रेयांनी आपल्याअनुग्रहाने एका विचित्र अशा योगशक्तिचा समावेश केला. पुण्यवान जनांस केवळ नामस्मरणाने अप्रयत्नांने सर्व मनोरथ पूर्ण होत तर पापीजन श्रीपादांची निंदा केल्याने त्यांच्यावर नाना प्रकारचे विघ्न व अनिष्ट कोसळत. श्रीपादांचे अग्नि स्वरूप आहे. त्यांनी धारण केलेले अग्नि वस्त्र होय. ते पवित्र योगाग्नि स्वरूप असून त्यांच्या पादुकांचा महिमा वर्णन करण्यास युगेही कमी पडतील. वेद - उपनिषद सुध्दा त्यांच्या पादुकांचे वर्णनकरण्यास असमर्थ आहेत. किती युग झाले ? किती कल्प लोटले ? केवढे वेळा स/ष्टी, स्थिति, लय क्रम पूर्ण झाले ? पण श्री दत्त ते श्री दत्तच. ते अद्वितीय असून साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ आहेत ! सृष्टीतील प्रत्येक अणु या परम सत्याचे साक्षीदार आहेत.
स्वयंभू दत्ताची पुन:प्रतिष्ठा
श्री पीठिकापुरास एका अवधूताचे आगमन झाले. ते उन्मत्त अवस्थेत असलेले सिध्दपुरुष होते. त्यांचे वागणे अती विचित्र होते. कोणास आशिर्वाद द्यायचे असले तर शिवी-गाळी करीत असा त्यांचा विचित्र स्वभाव होता. कोणाची स्तुती केली तर त्या व्यक्तीचे पुण्य क्षीण होत असे
पीठिकापुरवासीयांनी त्या सिध्दास स्वयंभू दत्त कोठे आहेत असे विचारले. तेंव्हा ते सिध्द पुरुष म्हणाले की, श्री दत्त सकल पुण्यक्षेत्रात स्नान करून सध्या एका नदीत आहेत. भक्तांनी खूप शोधायचा प्रयत्न केल्यावर एका नदीत स्वयंभू श्री दत्ताची मूर्ती सापडली. एका शुभ मुहूर्तावर त्या मूर्तीची पुन:प्रतिष्ठा, सर्वमंगलप्रद अशा सुमती महाराणी व ब्रह्मतेज असलेले श्री आप्पलराज शर्मा यांनी केली. त्या महोत्सवाचे अध्वर्यू श्री बापन्नार्य होते.
विद्यारण्यांचे प्राकटय :
मंदिरात मूर्तीची पुन:प्रतिष्ठा झालेल्या दिवशी, श्री बापन्नार्यानी, त्या सिध्दपुरुषास आपल्या घरी भिक्षेस येण्याची विनंती केली. आजोबांच्या घरी त्या सिध्दास श्रीपादांचे दर्शन झाले. केवळ दोन वर्षाच्या त्या बालकास पाहिल्यावर, त्या सिध्दाच्या मनात पुत्र वात्सल्य उत्पन्न झाले. श्रीपाद, मातुल श्री वेंकटप्पा यांच्या खांद्यावर बसून त्यांच्या शिखेशी चेष्टा करीत, सिध्दांकडे दृष्टी करून हासले. ते हास्य पाहून सिध्दास समाधी लागली. समाधी तून व्युत्थान झाल्यावर, श्रीपाद म्हणाले ''माधवा ! तुझ्या इच्छेप्रमाणे हिंदू साम्राज्याची स्थापना, माझे वय 16 वर्षाचे झाले असता, बुक्कराय करील. तू हरिहर-बुक्कराय यांच्या पाठीशी सदैव असले पाहिजे. विद्यारण्य महर्षि या नावाने तुझी ख्याती होईल. तुझ्या सहोदर सायणाचार्यांच्या वंशात येणाऱ्या शताब्दात गोविंद दिक्षिताचा जन्म होणार आहे. तो गोविंद दिक्षित कोणी नसून तूच असशील ! राजर्षी होऊन तंजावूर संस्थानात महामंत्रीचा पदभार सांभाळून कृतकृत्य होशील.''
असे ऐकल्यावर आनंदाने सिध्दाच्या डोळयातून अश्रूधारा वाहू लागल्या. त्याने श्रीपादांना आपल्याजवळ घेतले. इतक्यात श्रीपादांनी त्या सिध्दाच्या चरणांचे वंदन केले. सिध्दाने आश्चर्य व्यक्त करताच श्रीपाद म्हणाले -''तू विद्यारण्य या नावाने श्रुंगेरी पीठाधिपती होशील. तुझ्या शिष्य परंपरेत तिसरा शिष्य कृष्णसरस्वती म्हणून तूच असशील. तुझ्या मनात माझ्या विषयी पुत्र भाव उत्पन्न झाल्या कारणाने माझ्या पुढील नृसिंहसरस्वती या नावाने होणाऱ्या अवतारात काशी क्षेत्री कृष्णसरस्वती होऊन तू मला संन्यास दीक्षा देशील. तू संन्यास धर्माचा उध्दार करशील. यास काशी विश्वेश्वर व माता अन्नपूर्णा ह्यांची साक्ष असेल.
वशिष्ठ शक्ति पराशर त्र्यार्षेय प्रवरान्वित पाराशर गोत्रोद्भव ऋग्वेदांतर्गत , वाजपेययाजी माधवाचार्य हे विद्यारण्य महर्षी नावाने ख्यात होतील. बाबारे ! उद्या तुला आणखी चरित्र सांगिन असे म्हणून तिरुमलदासांनी, त्या दिवशीचे निरुपण तेथेच थांबविले.
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥
[17:06, 8/1/2020] 0 Imly: ॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
अध्याय -६
नरसावधानींचे वृत्त
दुसऱ्या दिवशी सकाळी जपध्यानादि पूर्ण झाल्यावर तिरुमलदास म्हणाले. ''बाबा ! श्रीपाद श्रीवल्लभ या चराचर सृष्टीचे मूल आहेत. ते वटवृक्षासारखे आहेत. त्यांचे अंशावतार सगळेच विविधता असलेल्या पारंब्या प्रमाणे आहेत (झाडातून निघालेले मूळ). तेच मूळ परत भूमीमध्ये जाऊन स्वतंत्र तत्त्व असल्यासारखे दिसते, परंतु त्यांना आधार वटवृक्षच असतो. देवदानवापासून समस्त प्राणिमात्रांना त्यांचाच आधार आहे. त्यांच्याकडूनच समस्त शक्तींना आश्रय प्राप्त होतो. पुनरपि त्या शक्ति त्यांच्यातच विलीन होत असतात. पर्वत शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तीस सगळया वाटा एक सारख्याच वाटतात. त्याच प्रमाणे सगळया प्रकारच्या सांप्रदायाचे लोक दत्ततत्त्वामधेच समन्वय पावतात. प्रत्येक प्राणीमात्रास कांतीचे एक वलय असते. मी पीठिकापुरत रहात असताना तेथे एक योगी आला. तो विग्रहाच्या कांतीवलया बद्दल माहिती सांगत असे. त्याला व्यक्तीची कांती कोणत्या रंगाची असून किती दूरवर व्यापून आहे ते सांगता येत असे. त्याने श्री कुक्कुटेश्वरालयात येऊन स्वयंभू दत्ताची सूक्ष्मकांती किती दूर व्यापून आहे आणि कोणत्या रंगाची आहे, ह्याची परिक्षा करण्याचे ठरविले त्या योग्यास स्वयंभू दत्ताच्या ठिकाणी श्रीवल्लभांचे दर्शन झाले. त्यांच्या मस्तकाच्या भोवताली विद्युल्लतेच्या तुलनेची धवलकांती अप्रतिमपणे व्यापून होती. त्या धवल कांतीच्या भोवती खालच्या भागात व्यापून असलेल्या निळया रंगाच्या कांतीचे त्यास दर्शन झाले. ती मूर्ति त्या योग्यास बघून म्हणाली, ''बाबा ! दुसऱ्यांचे सूक्ष्म शरीर किती दूर व्यापलेले आहे याची माहिती काढण्याच्या प्रयत्नात अमूल्य जीवन काळ व्यर्थ घालवू नकोस. प्रथम तुझ्या हिताचा विचार कर. थोडयाच दिवसात तुझा मृत्यू होणार आहे. सद्गति संपादन करण्याचा विचार कर. सर्व सत्यांचा, सर्व तत्वमूलांचा मूल असलेला दत्त मीच आहे. ह्या कलियुगांत पादगया क्षेत्रात महासिध्दपुरुषांच्या, महायोग्यांच्या, महाभक्तांच्या प्रेमभरित आव्हानानेच मी येथे अवतार घेतला आहे.''
स्वामींच्या या उपदेशाने त्याच्यातील पूर्व वासनांचा नाश झाला. सूक्ष्म शरिराच्या कांतीची माहिती मिळविण्याची त्याची शक्ति श्रीवल्लभांतच विलीन झाली, तो श्रीवल्लभांचे त्यांच्याच स्वगृहात दर्शन घेऊन धन्य झाला. स्वच्छ अशी धवलकांती असलेले श्रीवल्लभ निर्मळ असून, संपूर्ण योगावतार आहेत. निळया रंगाची कांती असणारे श्रीप्रभू अनंत प्रेमाने, करुणेने भरलेले आहेत आणि ह्या गुणांचे हे रंग निदर्शक आहेत. त्या योग्याची विश्रांती झाल्यावर श्रध्दापूर्ण चर्चा सुरू झाली. चतुर्वर्ण विभाग असलेल्या सुक्ष्म शरीराच्या कांतीचा भेददृष्टया निर्णय घ्यावा कां ? किंवा जन्मसिध्द कुलगोत्राच्या दृष्टीने निर्णय घ्यावा ? कोणत्या वर्णाचा जन्म असला तर वेदोक्त पध्दतीने उपनयन करावे ? कोणत्या वर्णाच्या लोकांचे शास्त्रोक्त म्हणजे पुराणोक्त उपनयन करावे ? उपनयनात भृकुटी मध्ये असलेल्या तिसऱ्या डोळयाचा संबंध असतो कां ? नसेल तर कांही विशेष आहे कां ? मेधावी लोक म्हणजे काय ? अशी चर्चा बराच वेळ गरम गरम चालली होती परंतु पंडितांचे मतैक्य होत नव्हते.
सत्यऋषिश्वर या नावाचे मल्लादि बापन्नावधानी ''पीठिकापुर ब्राह्मण परिषदेंचे'' अध्यक्ष होते. त्यांना बापन्ना आर्य असे सुध्दा लोक श्रध्देने म्हणत असत. ते मुख्यत: सूर्याची, अग्निची उपासना करीत. पीठिकापुरत झालेल्या एका यज्ञाचे अधिपत्य करण्याची त्यांना विनंती केली होती. यज्ञाच्या शेवटी कुंभवृष्टी झाली, अर्थात वर्षा झाली. सकल जन समुदाय आनंदला. श्री च्छवाई नरसिंह वर्मा या नावाच्या क्षत्रिय गृहस्थानी श्री सत्यऋषिश्वरांना त्यांच्या गावात रहावे अशी विनंती केली. परंतु यज्ञयागात मिळालेले धन शिधा तेवढेच श्रीबापन्ना आर्य घेत असत. त्या द्रव्यास शुध्दी नसेल तर ते स्वीकार करीत नसत. श्री वर्मांच्या विनंतीस त्यांनी नकार दिला, श्री वर्मांची अत्यंत प्रिय असलेली कपिला गाय होती. तीचे नांव गायत्री असे होते. ती भरपूर दुध देत असे. ती अत्यंत सुशील आणि साधु स्वभावाची होती. एकदा गायत्री दिसेनासी झाली. कुठेतरी हरवली. रस्ता विसरली असे वर्तमान श्री वर्मांना कळाले. श्री बापन्ना आर्य ज्योतिष शास्त्राचे पंडित असल्याने वर्मांनी त्यांना गायत्रीच्या क्षेम-कुशला संबंधी प्रश्न केला. तेंव्हा ''श्यामलांबापुरम् (सामर्लकोटा) मध्ये खानसाहेब नावाचा कसाई आहे. त्याच्याकडे ती आहे. लगेच न गेल्यास तिचा वध होण्याची भीती आहे बापन्ना आर्य म्हणाले. वर्मांनी शामलांबापुरास मनुष्यास पाठवण्याच्या प्रयत्नात बापन्ना आर्यांना एक अट घातली. बापन्ना आर्यांच्या वचनानुसार गायत्री मिळाली तर, वर्मानी तीन एकर भूमी, निवासास योग्य असे घर बापन्नाआर्यांना त्यांच्या पांडित्याचा बहुमान म्हणून द्यावे. बापन्ना आर्यांनी त्याचा अंगिकार न केल्यास गोहत्येचे पातक प्राप्त होईल. बापन्ना आर्य संकट स्थितीत पडले. त्यांनी हे दान जर नाही घेतले तर, वर्मा त्या गाईची हत्या होऊ देतील. त्यामुळे गोहत्येचे पातक लागेल. गोहत्या पातकापेक्षा पंडित बहुमानाचा स्विकार करणेच श्रेयस्कर ठरले आणि गायत्रीची रक्षा झाली. पीठिकापुरवासियांचे नशीब उघडले. श्री बापन्नावधानी तीन खंडी धान्य देणाऱ्या भूमीचे मालक झाले. त्यांना निवसासाठी घराची व्यवस्था झाली. श्री बापन्ना आर्यांना वेंकटावधानी नावाचा मुलगा व सुमती नावाची मुलगी झाली. तिच्या जन्मपत्रिकेत सर्व शुभ लक्षण असून ती चालते वेळी महाराणीस लाजवील अशी चाल आणि लचक असल्या कारणाने सुमती महाराणी असे तिचे नामकरण झाले.
श्रीबापन्ना आर्यांची कीर्ति थोडयाच काळात दाही दिशांना पसरली. घंडिकोटा अडनावाचा अप्पललक्ष्मी नरसिंहराज शर्मा नावाचा भारद्वाज गोत्री, अपस्तंभ, वैदिकशाखेचा एक बालक पीठिकापुरांत आला. त्यांच्या घरी कालाग्निशमन नावाने ओळखली जाणारी दत्ताची मूर्ति होती. ती दत्तमूर्ति पुजेच्या वेळी स्पष्ट बोलत असे. आदेश सुध्दा देत असे. लहाणपणीच अप्पल राजू शर्माचे मातृ –पितृ छत्र हरवले असल्याने तो पोरका झाला होता. पूजा समयी कालाग्निशमनाने ''तू पीठिकापुरत जाऊन हरितस गोत्रिक, अपस्तंभ सूत्राच्या वैदिक शाखेचे मल्लादि बापन्नावधानी यांच्या कडे विद्याभ्यास करावा'' असा आदेश दिला. श्री बापन्ना आर्यानी दत्ताच्याआदेशानुसार आपल्या घरी विद्यार्थी म्हणून आलेल्या राजशर्मास माधुकरी न मागू देता, आपल्याच घरात भोजनाची व्यवस्था केली. श्री बापन्ना आर्य शनिप्रदोष समयास शिवाराधना करीत असत. घरातील स्त्रिया शनिप्रदोषादिवशी शिवाचे व्रत करीत असत. पूर्वीच्या काळी नंदयशोदेने शनिप्रदोष, शिवाराधना केल्यामुळेच साक्षात् श्रीकृष्णाचे लालन पालन करण्याचा सुयोग घडून आला. बापन्ना आर्याबरोबर सुदैवाने श्री नरसिंह वर्मा, श्री वेंकटप्पैय्या श्रेष्ठी, आणि थोडे प्रमुख वैश्य लोक सहभागी होत.
श्री कुक्कुटेश्वर स्वामींच्या मुखातून निघालेली वाणी
सुमती आणि अप्पलराजुचा विवाह
एके वेळी शनिप्रदोश शिवाराधना झाल्या नंतर, श्री कुक्कुटेश्वराच्या शिवलिंगामधुन विद्युत्कांति प्रकाशत होती. त्यावेळी त्यातून वाणी झाली. ''बाबा ! बापनार्या, नि:संदेहपणे तुझी मुलगी सुमती महाराणीस अप्पलराजु शर्मास देऊन विवाह कर, त्यामुळे लोककल्याण होईल. हा दत्तप्रभूंचा निर्णय आहे. ह्या महानिर्णयाचे उल्लंघन करण्याचा ह्या चराचर सृष्टीमध्ये कुठल्याही व्यक्तीस अधिकार नाही.'' ही देववाणी वेंकटप्पया श्रेष्ठीला नरसिंह वर्माला, तेथे असणाऱ्या सर्व जन समुदायास ऐकण्यात आली. सगळे आश्चर्यचकित झाले.
गोदावरी मंडलांतर्गत आइनविल्ली ह्या गावातील राजवर्माचे बंधुमित्र परिवारास वर्तमान पाठवले. विवाहाचा निर्णय झाला. राजशर्माला घरदार नव्हते. त्यामुळे थोडा विचार चालला होता. श्री वेंकटप्पा श्रेष्ठी म्हणाले, ''मला पुष्कळ घरे आहेत त्यापैकी एखादे मी राजशर्मास देईन.'' राजशर्मा दान घेण्यास तयार नव्हते. श्री श्रेष्ठींनी राजशर्मांच्या सोयऱ्यांबरोबर बोलून राजशर्माला मिळणाऱ्या वडिलोपार्जित गृहभागाची किंमत लावली. ती एक वराह (जुन्या काळातील नाणे) ठरविली गेली. श्री श्रेष्ठींच्या घराची किंमत बारा वराह निश्चित केली. अकरा वराह देण्यास माझ्याकडे एक पै पण नाही असे राजशर्मा म्हणाले. तसे असेल तर मी माझ्या घराची किंमत 1 वराह मात्रच ठरवून विकतो.''दान घेण्यास तुम्हास संकोच असेल तर 1 वराह मला देऊन हे घर विकत घ्या'' असे श्रेष्ठी म्हणाले. श्रेष्ठीनी जे सांगितले ते धर्मसम्मत आहे असा सगळयांनी होकार दिला. श्री सुमती महाराणी आणि श्री अप्पल लक्ष्मी नरसिंह शर्मा यांचा विवाह महापंडितांच्या वेदघोषाने, मंगल वाद्याच्या गजरात मोठ्या थाटामाटात पार पडला. श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार अज्ञानाच्या अंधकाराला दूर करण्यासच झाला आहे. त्या कारणाने श्री प्रभूंनी कालदेवतेला, कर्मदेवतेला शाप दिला. त्या शापास अनुसरून अज्ञानांधकाराचे प्रतिक स्वरूप जन्मांध शिशु, आणि अप्राकृतिक प्रगतिचे स्वरूप दर्शविणारे लंगडे बालक अशी दोन बालके राजशर्मास प्राप्त झाली. आपली दोन्हि मुले अशा रीतिने अपंग असल्याने सुमति आणि राजशर्मा अत्यंत दु:खी होते. आइनविल्लि गावांत एक प्रसिध्द विघ्नेश्वराचे देऊळ आहे. श्रीराज शर्मा यांच्या दु:खाचा परिहार करण्यासाठी त्यांचे नातेवाईक तेथील महाप्रसाद पीठिकापुरात घेऊन आले. सुमती आणि राजशर्मानी तो प्रसाद आदराने घेतला. त्या दिवशीच रात्री सुमती महाराणीला स्वप्नात ऐरावताचे दर्शन झाले. नंतर काही दिवस शंख, चक्र, गदा, पद्म, त्रिशूल, विविध देवतेचे, ऋषींचे , सिध्दपुरुषांचे, योग्यांचे अशी अनेक दर्शने तिला स्वप्नात होत होती. कांही दिवसांनी जागृतास्थेत सुध्दा तिला दिव्य दर्शन होऊ लागले. डोळे झाकले कि पडद्यावरील चित्रपटासारखे दिव्यकांतीमय तपसमाधीत मग्न असलेले योगी, मुनी, अद्भुत दर्शन देत.
देवतांचे जन्मनक्षत्र आणि सुमतीच्या प्रसवसमयाचे नक्षत्रात असलेला संबंध
सुमती महाराणीने आपल्या पित्यास दिव्य अनुभवाबद्दल सविस्तर सांगितले. ते म्हणाले, ''ही सर्व लक्षणे महापुरुषाच्या जननाचे शुभसूचक आहेत.'' सुमती महाराणीचे मामा श्रीधर पंडित म्हणाले ''बाई ! सुमती ! रवि (सूर्य) चे जन्मनक्षत्र विशाखाचा आणि श्रीरामावताराचा संबंध आहे. कृतिका हे चंद्राचे जन्मनक्षत्र आहे. ह्याचा आणि श्री कृष्णावताराचा संबंध आहे. पूर्वाषाढा या नक्षत्रावर जन्मलेल्या अंगारकाचा श्रीलक्ष्मीनरसिंह अवताराशी संबंध आहे. श्रवण नक्षत्रावर जन्मलेल्या बुधाचा, बुध्दावताराशी संबंध आहे. पूर्वाफाल्गुनी नक्षत्रावर जन्मलेल्या गुरुचा विष्णुअंशाशी संबंध आहे. पुष्य नक्षत्रावर जन्मलेल्या शुक्राचा भार्गवरामाशी संबंध आहे. रेवती नक्षत्रावर जन्मलेल्या शनिचा कुर्मावताराबरोबर संबंध आहे. भरणी नक्षत्रावर जन्मलेल्या राहूचा वराह अवताराशी संबंध आहे. आश्लेषा नक्षत्रावर जन्मलेल्या केतुचा, मच्छावताराशी संबंध आहे. तू मला प्रश्न केलेला समय दैवी रहस्याशी संबंधित आहे. कोटयावधी ग्रहांना, नक्षत्रांना ब्रह्मांडाच्या स्थिती गतीला निर्देश देणारे दत्तप्रभूच जन्मास येतील असे मला निश्चित वाटते.''
दत्तप्रभु हे नित्य वैभव विभूति
आपले दिव्य अनुभव आणि श्रीधर पंडित यांचे मत सुमती महाराणीने राजशर्मास सांगितले. तेव्हा राजशर्मा म्हणाले, ''मी पूजा करते समयी कालाग्नीशमन दत्तांना विचारतो. कालाग्नीशमन दत्तात्रेयांची पूजा होत असता कोणत्याहि माणसाने ती पाहू नये असा नियम आहे. पूजेनंतर दत्त प्रभु मानवाच्या रूपात समोर बसून बोलतात. नंतर परत त्या मूर्तिमध्ये विलीन होतात, हा रोजचा आमचा नियम आहे. सामान्य विषय किंवा स्वार्थभरित समस्या आम्ही दत्ताला निवेदन करीत नाही.'' त्या दिवशी पूजे समयी दत्तमहाराज प्रसन्न होते. पूजेनंतर ते मानवी रूपात समोर बसले आणि श्रीधरा ! या ! असे बोलविले. दत्तमूर्तीमधून एक रूप बाहेर पडले आणि त्यांच्या समोर ध्यानस्थ बसले. परत आपल्या बोटाने संकेत करीत श्रीधरा ! या ! असे म्हणाले. तत्काळ ते रूप त्यांच्यातच विलीन झाले. राजशर्माला हे सगळेच आश्चर्यजनक होते. श्रीदत्तप्रभू म्हणाले, ''तू आता पाहिलेले रूप येणाऱ्या शताब्दीतील येणारा एकुलता एक अंशावतारच आहे. माझ्यात लीन झालेल्या जीवनमुक्ताना सुध्दा मी बोलावताच यावे लागते. आणि जा अशी आज्ञा झाल्यास पडद्याआड झाल्यासारखे जावे लागते. माझ्या आज्ञेचे पालन करणे त्यांना चुकतच नाही. माझ्या लीला विभूति केवळ भूमिवरच परिमित नाहीत. हे ब्रह्मांड सारेच माझ्या हातातील खेळण्याच्या चेंडुसारखे आहे. मी एका पायाने लत्ताप्रहार केल्यास कोटयावधी योजने पार करतो. मी जन्म मृत्यूच्या अतीत आहे, असे म्हणत श्री प्रभूनी राजशर्माच्या भूमध्यांत स्पर्श केला. लगेच राजशर्माला पूर्वजन्माची स्मृति झाली. त्याने एका युगात विष्णुदत्त या नावाने जन्म घेतला असून त्याची पत्नी सुमतीने सोमदेवम्मा नावाने जन्म घेतला होता असे ज्ञात झाले. श्री दत्तमहाराज पुढे म्हणाले, मी दत्त या रूपाने दर्शन देऊन तुमची काय इच्छा आहे असे विचारले होते. त्यावेळी पितृश्राध्दाच्या दिवशी जेवायला यावे अशी विनंती तुम्ही केली होती. सूर्याग्नि बरोबर मी श्राध्दाचे जेवण केले. तुमच्या पितृदेवतांना शाश्वत ब्रह्मलोकांची प्राप्ति करून दिली. मी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेऊन गेल्या 100 वर्षापासून ह्या भूमीवर योग्यांना, महापुरुषांना दर्शन देतच आहे. पीठिकापुरत सवितृकाठक चयन (होम) भारद्वाज महार्षिने त्रेतायुगात केला होता. तेव्हाचे त्या होमाचे भस्म पर्वतासारखे जमून बसले. कालांतराने ते भस्म द्रोणागिरी पर्वतावर शिंपडले गेले. मारूती द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असताना एक छोटा भाग गंधर्वपुरात (गाणगापुर) पडला. गंधर्वनगर भीमा, अमरजा पवित्र नद्याचा संगम प्रदेश आहे. श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवातर समाप्तिनंतर मी मीनअंश, मीन लग्नावर करंज नगरीत शुक्ल यजुर्वेदीय वाजसनेय माध्यंदिन शाखेत, नृसिंहसरस्वती या नांवाने जन्म घेऊन, गंधर्वनगरात अनेक लीला करीन. श्री शैल्यातील कर्दळीवनात 300 वर्ष तपोसमाधी नंतर, स्वामी समर्थ ह्या नांवाने प्रज्ञापुरात निवास करीन. जेव्हा शनि मीनेत प्रवेश करेल तेव्हा त्या शरिराचा त्याग करिन.''
दत्तप्रभुंचे हे वरील वक्तव्य राजशर्माने आपल्या धर्मपत्नीस सांगितले. त्यावेळी सत्यऋषिश्वर बापनार्य म्हणाले ''बाबा ! राजशर्मा ! तुझ्या पूर्वीच्या युगातील जन्मात श्री दत्तप्रभूंना, सूर्याला, अग्निला श्राध्द भोजन दिलेला तू पुण्यात्मा आहेस. ह्या जन्मात कोणत्याहि रूपांत दत्तमहाराज भोजन द्या असे विचारतील, तो दिवस पितृश्राध्दाचा असला तरी कसलाही विचार न करता ब्राह्मण जेवायच्या अगोदरच श्री दत्ताने भोजन विचारले तर जरूर वाढावे.'' बाई सुमती ! ही गोष्ट लक्षात ठेव .''
बाबा ! शंकरभट्टा ! दत्तप्रभुंच्या लीला अलौकीक आहेत. आतापर्यंत कधीही न ऐकलेल्या आणि अपूर्व आहेत. महालया अमावस्येचा दिवस होता. राज शर्मा पितृश्राध्दाच्या तयारीत होते. दारा समोर ''भवति भिक्षांदेही'' असा आवाज ऐकला आणि त्या अवधूताला सुमती महाराणीने भिक्षा घातली. काही मागणे माग, असे म्हणणाऱ्या अवधूताला सुमती म्हणाली. ''बाबा आपण अवधूत आहात. आपले वाक्य म्हणजे सिध्दवाक्यच आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार लवकरच या भूमीवर होईल असे विद्वान लोक सांगतात. दत्तप्रभू आता कोणत्या रूपात संचार करीत आहेत? या शंभर वर्षापूर्वीपासून ह्या भूमिवर श्री दत्तप्रभू श्रीपाद श्रीवल्लभ या रूपात फिरत आहेत असे ज्ञातहोत आहे. आपण मला ''काहीतरी माग'' असे म्हटलेत. मला श्रीपाद श्रीवल्लभांचे रूप पहाण्याची फार तीव्र इच्छा आहे.''
श्रीपाद श्रीवल्लभांचा अविर्भाव (प्राकटय)
हे शब्द ऐकून त्या अवधूताने भुवने दणाणून जाण्यासारखे, भूकंप आल्यासारखे विकट हास्य केले. सुमती महाराणीला तिच्या सभोवतीचे समस्त विश्व एका क्षणातच अदृष्य झाल्यासारखे वाटले. समोर 16 वर्षे वय असलेला सुंदर बालक यतीच्या रूपात प्रकट झाला. आणि म्हणाला ''आई ! मीच श्रीपाद श्रीवल्लभ आहे. मीच दत्त आहे. अवधूतांच्या रूपात असतांना श्रीवल्लभांचे रूप पहाण्याची इच्छा व्यक्त केलीस. ती इच्छा पूर्ण करण्यास तुला श्रीवल्लभांच्या रूपात दर्शन दिले. श्रीवल्लभांच्या रूपात असलेल्या मला कोणतेही मागणे मागु शकतेस. तू मला जेऊ घालून तृप्त केलेस. जे मागशील ते वरदान द्यावे अशी इच्छा आहे. या जगातील लोकांनी संकल्प रूपाने पापकर्म केल्यास पापांचे फळच प्राप्त होते. संकल्पाने पुण्यकर्म केल्यास पुण्यकर्माचे फळ प्राप्त होते. निष्काम कर्माचे आचरण केल्यास त्याला अकर्म म्हणतात. ते सुकर्म ही नसते अथवा दुष्कर्म ही नसते. अकर्मास पुण्य किंवा पाप असे कोणतेच फळ नाही म्हणून दुसरेच फळ द्यावे लागते. ते भगवंताधिन असते. अर्जुनाने अकर्म केल्यामुळेच श्रीकृष्णाने त्याला कौरवांना मारावयास सांगितले. तसे मारल्यास पाप लागणार नाही असे श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितले होते. कौरवांचा संहार हा भगवंत निर्णयच होता. तुम्ही दंपतींनी पण विशेष असे अकर्म केले आहे. म्हणुन लोकहितार्थाने काही तरी प्रतिफळ दिले पाहिजे. निसंदेहाने तुझी इच्छा मला सांग, न चुकता ती पुरवीन.''
श्री दत्तांच्या दर्शनानंतर सुमती महाराणीला स्फुरलेला संकल्प
ती दिव्यमंगल मूर्ति पाहून सुमती महाराणीने पादाभिवंदन केले. श्रीवल्लभांनी सुमती महाराणीला उचलून उभे केले व म्हणाले ''आई ! मुलाच्या पाया पडणे हे अयोग्य आहे. याने मुलाचे आयुष्य क्षीण होते. तेंव्हा सुमती म्हणाली, ''श्रीवल्लभ प्रभू ! आई म्हणून बोलाविलेत. आपले हे सिध्दवाक्य आहे तेच बोल खरे करावे. तू माझा मुलगा म्हणून जन्मास यावे.'' यावर श्रीदत्त प्रभूंनी ''तथास्तु'' असा आशिर्वाद दिला व म्हणाले ''मी श्रीपाद श्रीवल्लभ या रूपाने तुझ्या गर्भात येईन. आईने लेकरांच्या पायावर पडणे हे लेकराचे आयुष्य क्षीण होणेच होय. म्हणून मी धर्मकर्माच्या सुत्रांच्या उलट जात नाही. मी पुत्र रूपाने 16 वर्षापर्यंत जीवन व्यतित करेन.'' त्यावर सुमती, म्हणाली केवढा हा अविचार 16 वर्षापर्यंतच आयुष्य !'' असे म्हणून विलाप करू लागली. त्यावर श्रीचरणांनी सांगितले, ''आई ! 16 वर्षापर्यंत तुम्ही, सांगाल तसे ऐकून राहीन. ''प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रं मित्रवदाचरेत्'' असे शास्त्र वचन आहे. 16 वर्षे वय असलेल्या मुलाबरोबर मित्रा सारखेच वागले पाहिजे. आपल्या इच्छांचे दडपण त्याच्यावर आणू नये. मला लग्न करण्यासाठी बंधन घालू नये. मला यति होऊन स्वेच्छेने विहार करण्याची परवानगी द्यावी. माझ्या या संकल्पाच्या विरुध्द तुम्ही बंधन घातले तर मी घरात राहणार नाही.'' असे सांगून त्वरित दत्त प्रभु अदृश झाले.
सुमती महाराणी अवाक झाली. तिला कांहीच कळेनासे झाले. घडलेला सारा वृतांत तिने आपल्या पतीस विवरण करून सांगितला. तेवढयातच अप्पलराजू म्हणाले, ''सुमती विचार करू नकोस, श्रीदत्त महाराज या प्रकारे आपल्या घरी भिक्षेस येतील असा विषय तुझ्या वडीलांनी सूचना म्हणून अगोदर सांगून =ठेवला होता. श्रीदत्त हे करुणेचा महासागर आहेत. श्रीवल्लभांचा जन्म होऊ दे, नंतर आपण विचार करू'' अप्पल राजुच्या घरी अवधूत आले ही वार्ता सगळया गावात पसरली. पितृदेवांची अत्यंत प्रमुख असलेली महालय अमावस्येच्या दिवशी ब्राह्मण जेवायच्या आधी अवधूतास भिक्षा दिली ह्या विषयाची चर्चा झाली. श्री बापन्नावधानी म्हणाले. ''श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म होणार हे सगळेच म्हणतात ! अवधूतांना साष्टांग नमस्कार करणे विहीतच आहे ! त्यामध्ये सुमतीचा काहीच दोष नाही. पुत्ररूपाने जन्मल्यावर त्याला साष्टांग नमस्कार केल्यास बालकाचे आयुष्य क्षीण होते. परंतु अवधूत वेषात असतांना साष्टांग नमस्कार करणे चूक नाही.'' या प्रसंगाने पीठिकापुरातील सर्व ब्राह्मणांची इर्ष्या वाढली विशेषत्वाने नरसावधानी या नावाच्या पंडितांची. अमावस्येच्या दिवशी सगळेच पितृकार्यामध्ये निमग्न झालेले होते. भोक्त्याचा दुष्काळच होता, ही फार मोठी समस्याच पडली. श्री बापन्नार्यांनी अप्पलराजुच्या घरी मात्र निर्विघ्नपणे कार्य पार पडेल असे सांगितले. श्री राजशर्मा कालाग्नी शमनांचे (दत्ताचे) ध्यान करीत होते. तितक्यात भोक्त म्हणुन तीन अतिथी आले. आणि पितृकार्य निर्विघ्नपणे पार पडले.
बाबा ! शंकर भट्टा ! त्या दिवशी वैश्यांना वेदोक्त्त उपनयन करण्याचा अधिकार आहे का ? नाही ? असा विषय चर्चेत मुख्यांश होता. ब्राह्मणांची परिषद जमली. बंगाल देशातील, नवद्वीपाहून आशुतोष या नावाचे पंडित पादगया क्षेत्रास आले होते. त्यांच्याकडे अत्यंत प्राचीन नाडी ग्रंथ होते. त्यांना देखील पंडित परिषदेचे आमंत्रण होते. बापन्नाचार्यांनी सांगितले, नियमनिष्ठेमध्ये ब्राह्मण, क्षत्रीय, वैश्य समानच असतात.
श्रीपादांच्या जन्मसमयी दृग्गोचर झालेले अद्भूत दृष्य
इतक्यात मी म्हणालो ''महाराज, श्रीपाद प्रभूंच्या लीला विस्तारपूर्वक सांगून मला धन्य करावे.'' अरे शंकर भट्टा ! नरसावधानी बापन्नार्यावर क्रोधित झाले व येनकेन प्रकारेण त्यांचा अपमान करण्याचे त्यांनी ठरविले . त्यांची (नरसावधानींची) बगलामुखी साधना विफल होण्याचे एकमेव कारण बापन्नार्यच आहेत असे त्यांच्या मनाने ठामपणे घेतले होते. तांत्रिक प्रयोगाने बापन्नार्याने त्यांची मंत्रसिध्दि निष्प्रभ केली असा कुप्रचार करण्यास त्यांनी सुरवात केली. नाडी ग्रंथात श्रीपाद प्रभूंच्या अवताराविषयी जे विवरण होते ते त्यांना विचलित करीत होते. नाडीग्रंथ हा मुलत: अविश्वसनीय आहे. बापन्नार्यानी मत्स्याहारी ब्राह्मणास भोजन दिले, हा अनाचार घडला असा नरसावधानी यांनी वाद मांडला. मनुष्य पूर्णब्रह्माचा अवतार कदापि होऊ शकत नाही. तर तान्हे बाळ श्रीपाद श्रीवल्लभ सर्वांतर्यामी, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान असे श्रीदत्त प्रभूंचे कसे बरे अवतार होऊ शकतील ? श्रीपाद प्रभूंनी अगदी लहान असताना केलेला प्रणवोच्चार, पाळण्यात असताना केलेला शास्त्र प्रसंग, आणि वयास न शोभणारे प्रज्ञेचे प्रदर्शन नरसावधानींना पटले नाही. एखादा विद्वानब्राह्मण श्रीपादाच्या शरीतात प्रवेश करून असे बोलतो आहे असा त्यांनी प्रचार केला. श्री कुक्कुटेश्वराच्या मंदिरात असलेले स्वयंभू तेच खरे दत्तात्रय आहेत. तेच वर प्रदान करणारे आहेत. या बालकास दत्तस्वरूप मानने चुकीचे आहे .असा नारसावधनी यांनी सर्वांचा समज करून देण्याचा प्रयत्न केला.
श्रीपादांच्या जन्मानंतर सतत नऊ दिवसापर्यंत ज्या जागेवर त्यांना निजवत असत त्या जागी एक तीन फण्यांचा नाग आपला फणा उभारून बाळावर छाया करीत असे. श्रीपाद मातेच्या गर्भातून साधारण बालका प्रमाणे जन्मास न येता ज्योति स्वरूपाने अवतरले होते. जन्म होता क्षणीच महाराणी सुमती मर्च्छित झाल्या. प्रसुतीगृहातून मंगल वाद्यांचा ध्वनी येऊ लागला. थोडया वेळात आकाशवाणी झाली व सर्वाना बाहेर जाण्याचा आदेश झाला. श्रीपादांच्या सानिध्यात चार वेद, अठरा पुराणे आणि महापुरुष ज्योति रूपाने प्रगट झाले व पवित्र वेदमंत्रांचा घोष बाहेर सर्वांना ऐकू येऊ लागला. थोडया वेळाने सर्वत्र शांतता पसरली. या अद्भूत घटना बापन्नार्याना सुध्दा अगम्य व आश्चर्यकारक वाटल्या.
श्रीपादांच्या बाललीला
श्रीपाद आता एक वर्षाचे झाले होते. ते आठ दहा महिन्यांचे असतानाच त्यांचे आजोबा बापन्नार्याबरोबर पंडितपरिषदेस जात असत. आजोबा आपल्या नातवाला बरोबर घेऊन जात. नरसावधानी आपल्या घरी राजगिऱ्याचे पीक काढीत. राजगिऱ्याची भाजी अत्यंत रुचकर असते. गावातील लोक नरसावधानीना ती भाजी देण्याची विनंती करीत. परंतु ते ती भाजी कोणालाच देत नसत. कोणाकडून काही विशेष काम करून घ्यायचे असल्यास त्याला ते ती भाजी देत व इच्छित काम करून घेत. श्रीपादांनी एकदा आपल्या आईस राजगिऱ्याची भाजी करण्यास सांगितले. ती भाजी सुध्दा नरसावधानीच्या घरचीच त्यांना हवी होती. परंतु हे काम कठीण होते. श्रीपाद लहान असतानाच स्वेच्छेने चालत नरसावधानींच्या घरी जात असत. त्यांच्या घरी शास्त्राविषयी चर्चा करीत, तसेच चित्र-विचित्र लीला करीत. पीठिकापुरत एका महापंडिताचा मृत्यु झाला होता. त्या पंडिताचा प्रेतात्मा श्रीपादाकडून विचित्र-कार्य करवून घेत आहे. या बालकास योग्य ते उपचार न करता बापन्नाचर्य व राजशर्मा हे दोघे या बालकास दत्तावतारी समजत आहेत, असे नरसावधानी सर्वाना सांगत. पीठिकापूर हे पादगया क्षेत्र असून पितृदेवांचे प्रधान स्थान आहे. विगत आत्म्यांशी संपर्क साधून संभाषण करण्याचे सामर्थ्य असलेले तत्त्ववेत्ते येथे राहात असत. श्रीपादांच्या शरीरात कोणत्यातरी महापंडिताचा आत्माच वास करीत आहे आणि त्यांच्याकडून अगम्य अशा लीला करवून घेत आहे, अशी धारणा पीठिकापुरम मध्ये दृढ होत होती.
तिरुमल दासांवर श्रीपादांचा दिव्य अनुग्रह
तिरूमलदास पुढे म्हणाले ‘ मी मलयाद्रीपुरमहून पीठिकापुरम येथे आलो तेव्हा श्रीबापन्नार्य आणि राजशर्मा यांच्या घरचा रजक होतो. नरसावधानीच्या घरचा जो रजक होता तो वृध्दावस्थेने मरण पावला होता. त्या रजकाचा मुलगा वायसपूर अग्रहार (सध्याचेकाकिनाडा) येथे निघून गेला होता. यामुळे त्यांच्या घरचे रजकाचे काम मला मिळाले होते. मी लहानपणापासून बापन्नार्युलुच्या सहवासात असल्याने माझ्यातील सतप्रवृत्ती जागृत झाली होती व अध्यात्माची ज्योत प्रज्वलित झाली होती. ज्या दिवशी मी नरसावधानींना पहात असे त्या दिवशी मला पोटाचा विकार होऊन अन्न ग्रहण न करण्याइतकी माझी दीन अवस्था होई. नरसावधानीचे कपडे मी स्वत: न धुता माझा मुलगा रविदास ते धूत असे. सात्विक प्रवृतीच्या लोकांचेच कपडे मी स्वत: धूत असे.
नरसावधानींचे कपडे मी स्वत: न धूता ते माझा मोठ मुलगा रविदास धूतो, ही वार्ता त्यांच्या कानी गेली. त्यांचे कपडे मी स्वत: धूवावे अशी त्यांनी आज्ञा केली. ती आज्ञा मानून मी नरसावधानीचे कपडे स्वत: धुऊ लागलो. मी कपडे धूत असताना श्रीपादाचे नाम स्मरण करीत असे. मी धुतलेले कपडे घेऊन रविदास नरसावधानींकडे गेला. मी धुतलेले कपडे जेंव्हा सगळयांनी घातले, तेंव्हा कोणालाच काही झाले नाही. परंतु नरसावधानींनी ज्या वेळी ते कपडे घातले, तेंव्हा त्यांना त्यांच्या अंगावर विंचू, गोम सरपटत असल्यासारखे वाटले. त्या कपडयामध्ये त्यांचे शरीर अग्नीवर ठेवल्याप्रमाणे पोळू लागले. नरसावधानींनी मला बोलवले व ते रागाने म्हणाले, कोणत्यातरी क्षुद्र विद्येचा, मंत्राचा प्रयोग मी कपडयावर केला आहे. त्या अपराधाबद्दल त्यांनी माझी न्यायाधिशाकडे तक्रार केली. परंतु चतुर न्यायाधिशांनी मला निर्दोष जाहीर करून सोडून दिले. मी आनंदात घरी आलो. थोडयाच वेळात श्रीपाद प्रभू एका सोळा वर्षाच्या युवकाच्या रूपात आमच्या घरी आले. श्रीपाद प्रभू वाटेल त्या रूपात येऊन भक्तांना दर्शन देत असत. मी आश्चर्याने म्हणालो, ''महाराज आपण उत्तम अशा ब्राह्मण कुलामध्ये जन्मलेले आहात, तेंव्हा आमच्या सारख्या रजकांच्या वस्तीत येणे कांही योग्य नाही.'' तेव्हा प्रभू म्हणाले ''नरसावधानीसारखे पापाचे गाठोडे डोक्यावर वाहणारे ब्राह्मण खरे तर रजकांपेक्षा कमी दर्जाचे असतात. परंतु तुझ्यासारखे ब्राह्मणांची ओढ असलेले रजक त्यांच्यापेक्षा श्रेष्ठच असतात.'' श्रीपादांचे ते शब्द ऐकून मी त्यांच्या चरणांवर नतमस्तक झालो आणि ढसा ढसा रडलो. श्रीप्रभूंनी माझ्याकडे अमृतदृष्टीने पाहिले व आपल्या दिव्य हाताचा स्पर्श करून मला उठवले. नंतर त्यांनी आपला उजवा हात माझ्या शिरावर ठेवला आणि त्याच क्षणी मला पुर्वीचे जन्म आठवले . माझ्यातील योग शक्तींना चालना मिळाली. कुंडलिनी शक्ती सुध्दा जागृत झाल्याचा अनुभव येऊ लागला. श्रीपाद प्रभू हळू हळू पाऊले टाकीत अंतर्धान पावले.
श्रीपाद प्रभूंनी आपल्या आईजवळ राजगिऱ्याची भाजी करून देण्याचा हट्ट केला. त्यांना नरसावधानींच्या घरातील भाजी हवी होती. परंतु ती गोष्ट अशक्य वाटत होती. या वेळी बापन्नार्य म्हणाले, ''श्रीपादा ! उद्या सकाळी मी तुला नरसावधानींच्या घरी घेऊन जातो. तू स्वत: त्यांना राजगिऱ्याची भाजी देण्याची विनंती कर. परंतु जर त्यांनी ती भाजी देण्यास नकार दिला तर त्याभाजीसाठी पुन्हा कधी हट्ट करू नकोस.'' दुसऱ्या दिवशी बापन्नार्य बालक श्रीपादाला घेऊन नरसावधानीकडे गेले. त्यांच्या घरी जाताच बापन्नार्य श्रीपादांना म्हणाले, ''श्रीपादा ! मोठ्यांना नमस्कार करून त्यांचे आशिर्वाद घ्यावेत. नरसावधानी बाहेर ओसरीवर बसले होते. त्यांची लांब शिखा पाठीवर रुळत होती. ती नरसावधानींना अत्यंत प्रिय होती. श्रीपादांनी नरसावधानींकडे बघितले व दोन हात जोडून त्यांना नमस्कार केला. श्रीपादांची तीक्ष्ण नजर नरसावधानींच्या पाठीवर विसावलेल्या शिखेवर पडली आणि काय आश्चर्य ती आपोआप गळून खाली पडली. ती पाहून नरसावधानी अगदी गोंधळून गेले. या वेळी श्रीपाद म्हणाले, ''आजोबा ! नरसावधानी आजोबांची अत्यंत प्रिय असलेली शिखा गळून पडली. आता त्यांच्याकडे राजगिऱ्यांची भाजी मागणे योग्य होईल काय ? चला आपण घरी जाऊ.'' श्रीपादांनी राजगिऱ्याची भाजी पुन्हा कधीही विचारली नाही.
श्रीपादांच्या नमस्कारामुळे झालेले नुकसान नरसावधानींच्या लक्षात आले. ते ध्यानात बसले असता त्यांच्या शरीरातून त्यांच्या सारखेच दिसणारे एक तेजोवलय बाहेर पडले. नरसावधानींनी त्या तेजोवलयास विचारले ''तू कोण ? कोठे चाललास ?'' त्या तेज:पुंज नरसावधानी सारखे दिसणाऱ्या आकृतीने उत्तर दिले ''मी तुझ्यात राहणारे पुण्यशरीर आहे. तू आतापर्यंत कितीतरी वेद पठन केलेले आहेस. स्वयंभू दत्तात्रेयांची आराधना केलीस, परंतु साक्षात श्री दत्तात्रेयांचे अवतार श्रीपाद श्रीवल्लभांचा अपमान केलास. तुला तुझ्या शिखेवर, राजगिऱ्याच्या भाजीवर असलेले प्रेम, आसक्तीच्या एक लक्षांश प्रेम जरी श्रीपादांच्या विषयी असते तर तुझ्या जन्माचे सार्थक झाले असते. परंतु मोहपाशांनी स्वत:स बांधून घेऊन मोक्षाची एक दिव्य संधि घालवलीस . तू लवकरच दरिद्री होशील. त्या दारिद्रयाचे हरण करण्यासाठी श्रीपाद प्रभूंनी तुला ''शाकदान'' मागितले होते. त्यांना जर तू ते दान दिले असतेस, तर तुला आता येणारे दारिद्रय न येता उत्तम ऐश्वर्य प्राप्त झाले असते. तू स्वत: आपल्या हातांनी ही संधि दवडलीस. श्रीपाद प्रभू करूणेचे सागर आहेत. हा अवतार संपल्यावर ते दुसरा नृसिंहसरस्वती नांवाने अवतार ग्रहण करतील. त्यावेळी तू एक दरिद्री ब्राह्मणाच्या रूपात जन्म घेशील. त्या जन्मात सुध्दा तू घरी राजगिऱ्याची भाजी पिकवशील. त्यावेळी योग्य समय पाहून मी पुन्हा तुझ्या शरीरात प्रवेश करीन. त्यावेळी श्रीपाद प्रभू तुझ्या घरी भिक्षेसाठी येतील. तू प्रेमाने वाढलेली भिक्षा घेऊन तुला ते ऐश्वर्य प्रदान करतील. सध्या मात्र मी तुझे शरीर सोडून जात आहे. श्रीपाद प्रभूंनी केलेला नमस्कार तुला नव्हता तर तुझ्यातील पुण्य स्वरूपात वास्तव्य करणाऱ्या मला होता. त्यांनी मला, तुला सोडून देऊन त्यांच्या स्वरूपात लीन होण्याची आज्ञा केली होती. त्यानुसार मी श्रीपादाच्या स्वरूपात लीन होण्यास जात आहे. आता तुझ्या शरीरात केवळ पाप पुरुषच उरला आहे.'' असे बोलून तो पुण्यात्मा श्रीपादांमध्ये विलीन झाला.
कालांतराने नरसावधानींची प्रकृती क्षीण होत गेली. लोक त्यांच्या शब्दांचा निरादर करू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर विलसणारे विद्वत्तेचे तेज लोप पावले. याच वेळी पीठिकापूरात विषूचि (कॉलराची) साथ पसरली. यात अनेक ग्रामवासी या रोगास बळी पडले. दूषित पाण्यामुळे हा रोग बळावत असल्याचा निष्कर्ष गावातील वैद्यांनी काढला. भयभीत झालेल्या ग्रामवासियांनी यामहामारीच्या रोगावर शास्त्रीय रीतिने निर्मूलन पध्दती काढावी अशी प्रार्थना श्री बापन्नार्यांना केली. श्री बापन्नार्यानी आपल्या अंतर दृष्टीने जाणले की महामारी जलदोषाने झालेली नसून वायुमंडल कलुषित झाल्याने झाली आहे. परंतु बापन्नार्याचे हे मत गावातील वैद्यांना पटले नाही. ग्रामस्थानी ग्रामदेवतेस पशुबली देऊन तांत्रिकाकडून विविध प्रकारच्या पूजा, महामारीच्या निर्मूलनासाठी केल्या. पशूचा बळी दिल्याने त्यांच्यातील प्राणशक्ती बळजबरीने बाहेर काढली जाते व तिला मंत्रोच्चाराने वश करून घेतात. प्राणशक्तीस वृध्दिंगत करण्यासाठी योगाच्या प्रक्रिया किंवा सात्विक आराधनेचा अवलंब करणे अधिक योग्य आहे असे श्री बापन्नार्यांचे मत होते. त्यांनी ग्रामवासियांना असे सुचविले परंतु अंधश्रध्देने त्यांनी पशुबळी देण्याचे थांबवले नाही. गावातील कांही मंडळींनी पशुबळीचा विषय श्रीपाद प्रभूंपुढे काढला. त्यावर श्रीपाद म्हणाले ''ग्रामदेवतेस विनंती केली आहे की तिने पशुबळीचा स्वीकार करू नये.'' श्रीपादांच्या आज्ञेनुसार ग्रामदेवता समुद्रस्नान करण्यास गेली आहे. आता दूध उतू घालून देवतेस नैवेद्य अर्पण केल्यास या रोगराई पासून तुमची सुटका होईल. कालिकेचे रूप धारण केलेली ग्राम देवता शांत होईल. ही वार्ता गावातील सर्व लोकांना कळविण्यासाठी एका चर्मकारास बोलावून चर्मवाद्यावर दवंडी पिटविण्यास सांगितले. दवंडी कोणी पिटायची असे विचारल्यावर श्रीपाद म्हणाले विषुचि रोगाने ग्रस्त वेंकय्या याने दवंडी पिटावी, असा माझा निरोप त्यास सांगा. ते सर्व ग्रामवासी वेंकय्याजवळ गेले, तो मरणासन्न होता. त्याला हा निरोप देताच तो मुरच्छित पडला. एका घटकेनंतर जेव्हा तो शुध्दिवर आला तेव्हा तो पूर्णपणे बरा झाला होता. ही बातमी हा हा म्हणता संपूर्ण पीठापुरममध्ये चर्चेचा विषय झाली. व्यंकय्याने गावात फिरून चोहिकडे दवंडी पिटली. बापन्नार्यानी आपल्या सेवकास, पाण्याने भरलेले एक मोठे भांडे त्यांच्या समोर आणून ठेवण्यास सांगितले. वायुमंडलातील विषारी किटाणूंचा नाश करण्यासाठी योग्य त्या मंत्राचे संधान केले. आणि तत्काळ हवेतील विषारी किटाणू पाण्यात टप टप येऊन पडले. अशा प्रकारे वायुमंडल शुध्द झाले आणि महामारी रोगाचे निर्मुलन झाले.
श्रीपादांच्या जन्मतिथीस (वाढदिवसाच्या दिवशी) राजशर्मा पत्निसह श्रीपादांना घेऊन, बाळाचे आजोबा श्री बापन्नार्य यांच्याकडे आले. ज्या ज्या वेळी बापन्नार्यानी श्रीपादांच्या चरणावरील शुभचिन्हे पहाण्याचा प्रयत्न केला, त्या त्या वेळी त्यांना कोटी कोटी सूर्याच्या तेजस्वितेचा अनुभव येई व ती शुभचिन्हे त्या तीव्र प्रकाशात दिसत नसत. याचे त्यांना राहून राहून आश्चर्य वाटे. परंतु त्या दिवशी उष:काली साळीच्या कोंडयावर दिव्य असे पदचिन्ह दिसले. त्यांनी आपली कन्या सुमतीस विचारले, ''बाळ या कोंडयावरुन कोण गेले. तुमचा लाडका नातूच येथून गेला. आणखी कोण बाबा'' सुमतीने उत्तर दिले. ते पदचिन्ह षोडशवर्षीय कुमाराच्या पदचिन्हासारखे होते. आजोबांनी श्रीपादांना आपल्या मांडीवर घेतले व त्याच्या चरण कमलांचे ते निरिक्षण करू लागले. या वेळी त्यांना दिव्य प्रकाश न दिसता मीच साक्षात दत्तात्रेयांचा अवतार आहे असे सूचित करणाऱ्या सुस्पष्ट अशा चिन्हांचे दर्शन झाले. त्या दिव्य चरणांचे बापन्नार्यांनी कौतुकाने चुंबन घेतले. हा बालक श्री दत्तात्रेयाचा अवतार असल्याचा त्यांचा निर्धार दृढ झाला. त्याच वेळी त्यांच्या मुखातून श्री दत्ताच्यास्तुतीपर पद आपोआप निघाले. त्या दिव्य चरणांच्या दर्शनाने बापन्नार्याच्या अंगी अष्टभाव सिध्द झाले. त्यांच्या डोळयातून आनंदाश्रू वाहू लागले. ते श्रीपादांच्या गालावर ओघळले आणि मोत्याच्या बिंदु सारखे चमकत होते. आजोबानी आपल्या उपरण्याने हळुवारपणे श्रीपादाच्या गालावरील ते थेंब पुसले. या वेळी श्रीपाद म्हणाले. आजोबा तुम्ही सौरमंडलातून शक्तिपात करून ती शक्ति श्रीशैल्यस्थित श्री मल्लिकार्जुन शिवलिंगात आकर्षित केली होती. त्याच वेळी सूर्यमंडलातील ती शक्ति गोकर्ण महाबळेश्वरी व पादगया क्षेत्री स्थित असलेल्या स्वयंभू श्रीदत्तात्रेयांच्या ठायी सुध्दा आकर्षित झाली. गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रास अधिक शक्तिसंपन्न करण्याचा संकल्प आहे. प्राणी मात्रातून जे अनिष्ट स्पंदन बाहेर पडतात त्या स्पंदनाना माझ्यात लय पावून, जे माझे साधक, आश्रित आहेत त्यांच्या प्रति शुभ स्पंदनांचे प्रसारण व्हावे असा माझा संकल्प आहे. गोकर्ण महाबळेश्वर हे परमेश्वराचे ''आत्मलिंग'' आहे. त्याच्या केवळ दर्शनाने मुक्ति साध्य होते. तसेच श्रीशैल्याच्या दर्शनाने सुध्दा मुक्तिचे फळ प्राप्त होते. येथील मल्लिकार्जुनास शक्तिसंपन्न करण्याचा संकल्प आहे. तुम्ही सत्यऋषी आहात. मी यतीच्या रूपात होतो तेव्हा आईने मला नमस्कार केला, त्यामुळे मी अल्पायुषी होणार असे आपले मत होते. परंतु आईने मला श्रीपाद रूपात नमस्कार केला म्हणून मी अल्पायुषी होणार असे म्हणालो तेंव्हा आपल्या दोघांचेही म्हणणे खोटे होऊ नये म्हणून मी केवळ सोळा वर्षे पर्यंत तुमच्या घरी राहण्याचे ठरविले आहे. संसार बंधनातून मुक्तीची इच्छा करणाऱ्या मुमुक्षूंना अनुग्रह देण्याचे कार्य पुढे आहे. मी चिरंजीव असावे असा तुमचा संकल्प आहे, तो मी पूर्तीस नेईन. श्रीपाद श्रीवल्लभ हे स्वरूप गुप्त करेन. नृसिंह सरस्वती हा अवतार घेतला तरी श्रीपाद श्रीवल्लभ रूप हेच नित्य सत्य रूप म्हणून राहील. नृसिंह सरस्वतीचे अवतारकार्य पूर्ण करून श्रीशैल्यास असलेल्या कदलीवनात तीनशे वर्षे पर्यंत तपश्चर्या करून प्रज्ञापूर (अक्कलकोट) येथे स्वामी समर्थ रूपात प्रकट होईन. तेथील वटवृक्षामध्ये माझी प्राण शक्ति प्रवेश करवून मल्लिकार्जुन शिवलिंगात विलिन होईन.
बापन्नार्याना हे सगळे आश्चर्यकारक व अद्भूत असे वाटले. आजोबांच्या घरी पहिल्या वर्षीचा वाढदिवस अति आनंदात व थाटाने साजरा झाला. पीठिकापुरमला त्या दिवशी आणखी एक आश्चर्य घडले. नरसावधानी, देवळाचे पुजारी आणि अजून कांही मंडळी कुक्कटेश्वराच्या मंदिरात दर्शनाला गेले असताना, त्यांना तेथे स्वयंभू दत्तात्रेयांची मूर्ती दिसली नाही. मंदिरातील मूर्ती दिसेनाशी झाल्याची वार्ता गावात दावानलासारखी पसरली. नरसावधानींच्या विरूध्द असलेला एक तांत्रिक मूर्ती अदृश्य होण्याचे कारण नरसावधानींच आहेत असे मोठ्या तावातावाने म्हणू लागला. नरसावधानी क्षुद्र विद्येचे उपासक आहेत त्यांनीच मूर्ती अदृश्य केली, असा प्रचार गावात करण्यास त्याने सुरुवात केली. पिठपुर पीठापुरमच्या ब्राह्मणांनी नरसावधानींच्या घराची झडती घेण्याचे ठरविले . ते ब्राह्मण श्री बापनार्यांना भेटले व झालेला प्रकार सांगितला. तेव्हा बापन्नार्य त्या ब्राह्मणास म्हणाले, सत्य प्रत्ययास येईपर्यंत मौन राहावे. योग्य वेळी या प्रश्नाचे समाधान होईल. नरसावधानींच्या घराची झडती घेऊन संशयित स्थळी खोदकाम केल्यावर तेथे मानव कपाल व क्षुद्र विद्येस उपयोगी पडणाऱ्या कांही वस्तु सापडल्या, परंतु श्रीदत्तात्रेयांची मूर्ती मात्र मिळाली नाही. श्री नरसावधानी मूर्तीच्या चोरीच्या आरोपापासून मुक्त झाले. परंतु ते क्षुद्र विद्येचे उपासक असल्याचे सिध्द झाले. दिवसेंदिवस त्यांची प्रकृति क्षीण होत होती. त्यांच्याकडे एक वांझ गाय होती. तिला बैलाप्रमाणे शेतीच्या कामासाठी वापरीत व वेळेवर दाणा-पाणी सुध्दा देत नसत. एके दिवशी, नरसावधानींच्या विरूध्द असलेल्या तांत्रिकाने त्या गायीच्या शरीरात क्षुधा शक्तीचे आवाहान केले. त्यामुळे त्या गायीने खुंटाचे बंधन तोडून टाकून ती घरात शिरली व घरच्या लोकांना शिंगाने मारू लागली. नरसावधानींनी अतिप्रेमाने लावलेला राजगिऱ्याच्या भाजीचा मळा तिने उध्वस्त केला. त्या गायीच्याजवळ जाऊन तिला दोरीने बांधणे कोणासच शक्य झाले नाही. त्याच दिवशी नरसावधानींच्या घरी त्यांच्या आईचे श्राध्द होते. श्राध्दाचा संपूर्ण स्वयंपाक झाला होता. श्राध्दाच्या ब्राह्मणांचे भोजन झाले होते. घरच्या मंडळीचे मात्र जेवण अजून झाले नव्हते. त्या गायीने सारे अन्न व वडे खाऊन टाकले. याच वेळी बालक श्रीपाद प्रभु आपल्या वडिलांना नरसावधानींच्या घरी घेऊन जाण्याचा हट्ट करू लागले. श्रीराज शर्मा त्यांना घेऊन नरसावधानींच्या घरासमोर जाऊन उभे राहिले. तेवढयात ती गाय नरसावधानींच्या घरातून बाहेर आली. तिने अंगणात उभे असलेल्या श्रीपादांना तीन प्रदक्षिणा घातल्या व नंतर त्यांच्या चरणी नतमस्तक झाली व त्याच अवस्थेत गतप्राण झाली.
या प्रसंगानंतर गावातील लोक अनेक मते व्यक्त करू लागले. गायीने खाल्लेल्या वडयामध्ये विष होते व ते खाल्याने गाय मरण पावली. आता नरसावधानींना गोहत्येचे पातक लागेल असे नाना लोकापवाद उठू लागले. यामुळे नरसावधानी त्रस्त झाले होते. त्या गायीने श्रीपादांना तीन प्रदक्षिणा घातल्या व नंतर त्यांच्या चरणांवर मस्तक ठेऊन प्राण सोडले. त्या कारणाने श्रीपाद हे दैवी अवतार असल्याची सर्व लोकांची खात्री झाली. राजशर्माना आयुर्वेद शास्त्राचे ज्ञान होते. ते नरसावधानींच्या विनंतीनुसार त्यांचा औषधोपचार करीत होते. परंतु त्यांच्या दुर्धर रोगावर औषधाचा कांही परिणाम दिसून येत नव्हता. नरसावधानींची प्रकृती खालावतच गेली आणि त्या रोगातच त्यांचा एके दिवशी देहांत झाला.
नरसावधानींच्या मृत्यूमुळे गावातील लोक श्री राजशर्मानी त्यांना उत्तम औषध दिले नाही. त्यामुळे ते आपल्या जीवास मुकले असे बोलू लागले. कांहीजण म्हणू लागले की श्रीपाद श्रीवल्लभ नरसावधानीकडे रोज जात असत. ते जर दत्तावतारी असते तर नरसावधानींचा मृत्यू कसा झाला ? अनेकांनी गोहत्येचे पातकच त्यांच्या देहांताचे कारण असल्याचा निर्वाळा दिला. नरसावधानींच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी श्री राजशर्मा व श्रीपाद गेले असताना नरसावधानींच्या पत्नीने त्यांचा हात धरून म्हटले ''अरे बाळा श्रीपादा ! चिमुटभर सौभाग्याचे वाण घेण्यासाठी मी दूर दूर पर्यंत हळदी कुंकुवास जात होते. तू दत्तात्रेयच आहेस तर नरसावधानी आजोबाना जिवंत करणे तुला शक्य नाही का ?'' असे म्हणून ती माउली रडू लागली. नवनीतासम मृदु हृदय असलेल्या श्रीपाद प्रभूंनी त्या मातेचे अश्रु पुसले. शवयात्रा सुरू झाली. राजशर्मा व श्रीपाद त्या अंतिम यात्रेत सहभागी झाले. नरसावधानीच्या ज्येष्ठ पुत्राने पित्याच्या चितेस अग्नी देण्यासाठी अग्नी हातात घेतला. त्याच वेळी श्रीपादांच्या नयनांतून दोन थेंब बाहेर पडले. याच वेळी मेघगर्जनेसारख्या आवाजात श्रीपाद म्हणाले ''अहाहा ! मृत झालेल्या पित्याच्या शरीरास अग्नी देणारे पुत्र तर पाहिले. परंतु जिवंत पित्यास अग्नी देणाऱ्या पुत्रास पाहिले नाही.'' हे वक्तव्य ऐकून स्मशानात जमलेले सारे लोक निस्तब्धतेने श्रीपादांकडे पाहू लागले. श्रीपादांनी चितेवर असलेल्या नरसावधानींच्या भ्रूमध्यावर अंगुष्ठाने स्पर्श केला, त्या दिव्य स्पर्शाने नरसावधानींच्या अंगात चैतन्य स्फुरू लागले आणि आश्चर्य असे की कांही क्षणातच ते चितेवरून खाली उतरले. त्यांनी श्रीपाद प्रभूंना साष्टांग नमस्कार केला. नंतर ते सर्व लोकांबरोबर घरी परतले. त्यांना सजीव घरी आलेले पाहून त्यांच्या पत्नीस अत्यंत आनंद झाला. श्रीपादप्रभूंच्या अंगुष्ठ स्पर्शाने नरसावधानींना कर्मसूत्राचे सूक्ष्म ज्ञान आले. त्यांच्या घरातील मृत झालेली वांझ गाय, ही गत जन्मातील नरसावधानींची माता होती. त्यांच्या घरी असलेला बैल हे त्यांचे पिताश्री होते. या गोष्टीचा बोध नरसावधानींना झाला. मरते समयी त्या गायीने श्रीपाद प्रभुंना आपले दुध त्यांनी प्यावे अशी विनंती केली होती. पुढच्या जन्मी जेंव्हा वांझ म्हैस म्हणून ती जन्माला येईल त्यावेळी श्रीपाद प्रभु नृसिंहसरस्वती अवतारात तिचे दुग्धपान करतील. हे श्रीपादानी गायीस दिलेले वचन नरसावधानींना कळले. ज्या तांत्रिकाने नरसावधानींवर प्रयोग केला होता, त्याचा मृत्यू लवकरच होणार असून, पुढच्या जन्मी तो ब्रह्मराक्षसाच्या योनीत जन्म घेणार असून, त्याच्यावर यतिरूपात असलेल्या श्रीपादांचा अनुग्रह होईल असे सूक्ष्म लोकातील विषय नरसावधानींना श्रीपादाच्या कृपाप्रसादाने ज्ञात झाले. त्यांना स्वत:च्या पुढील जन्माची माहिती सुध्दा कळली. पुढील जन्मात त्यांच्या घरी यतीरूपाने श्रीपाद प्रभु येऊन त्यांच्याकडून राजगिऱ्याच्या भाजीची भिक्षा स्वीकारून, राजगिऱ्याचे पीक स्वहस्ते नष्ट करून, त्याच्या मुळाशी असलेला सोन्याच्या नाण्यांनी भरलेला हंडा त्यांना देतील. ही भविष्यवार्ता नरसावधानींना श्रीपादांच्या अंगुली स्पर्शाने कळली होती.
श्रीपादांचा चेहरा अतिशय सात्विक, सुंदर, दैदिप्यमान असा होता. त्यांची तुलनाच होऊ शकत नाही. श्रीपाद प्रभुंनी नरसावधानी आणि त्यांच्या पत्नीस केलेला उपदेश, त्यांचा अनुग्रह केलेली विधाने मी तुला उद्या सांगेन. आता आपण त्यांचे स्मरण करीत भजनात रंगून जाऊ या. ज्या ठिकाणी त्यांचे नामस्मरण, भजन, कीर्तन होते, त्या ठिकाणी श्रीपाद प्रभु सूक्ष्म रूपाने संचरण करीत असतात, हे अक्षर सत्य आहे. तिरुमलदासासारख्या भक्ताच्या सत संगतीने आनंदाने आम्ही पुलकित झालो.
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥